मुंबई : राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्यात चांगलाच गदारेळ पाहायला मिळाला. यामध्ये शिंदे गटातील कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद झाला असल्याचं पाहायला मिळालं. यावरून काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत मात्र सभागृहाच्या पायऱ्यांवर जोर जोरात बोंबलतात, असा टोला आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना लगावला आहे.
गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’; सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा
शिंदे गट आणि भाजपचे आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार त्या ठिकाणी आले. जर कोणी त्या ठिकाणी घोषणाबाजी करत आसेल तर त्या ठिकाणी कोणी जाऊ नये असं ठरलेलं आहे. जाणीव पुर्वक शिंदे गटातील आमदारांच्या गोल उभे राहत घोषणाबाजी करण्यात आली. जर 50 खोके दिलेत असं वाटत असेल तर आमच्यावर कारवाई करा, असं नामर्दा सारखं का बोलताय. मर्द असाल तर समोर या, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार?
काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत. सभागृहाच्या पायऱ्यांवर जोर जोरात बोंबलतात. आणि त्यांचेच फोटो सर्वत्र येतात. सभागृहात बोलणाऱ्याचा फोटो कोणीच घेत नाही मात्र पायऱ्यांवर बोंबलणाऱ्यांची ब्रेकींग चालते, असा टोला बच्चू कडू यांनी अमोल मिटकरी यांच्यावर लगावला आहे.
छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार
उद्धव ठाकरे यांनीच नाही तर सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी गावोगावी फिरले पाहिजे. महाराष्ट्र पिंजुन काढला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, ही लोकशाही आहे. घरी बसणारे जेव्हा गावा गावात जातील तेव्हाच सगळे गावोगावी पोहचतील, असा टोला बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
Read also
- “राष्ट्रवादीची ‘बी’ टीम ब्रिगेड बरोबर राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम नवाब सेनेची युती”; मनसेचा शिवसेनेला टोला
- “नितेश राणे रात्री पत्र लिहतात काय?”; किशोरी पेडणेकरांचा राणेंना टोला
- “फुसक्या बारला युवराज वगैरे म्हणू नका”
- “शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार”; उद्धव ठाकरेंची मोेठी घोषणा
- “मला घरी जायचं आहे..माझे प्रश्न लवकर घ्या”; केसरकरांच्या विनंतीने सभागह आवाक