मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी आज माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र काम करणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?”
संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षे काम करते आहे. संभाजी ब्रिगेडचं 2016 ला राजकीय पक्षात रुपांतर करण्यात आलं. लोकशाही टिकवण्यासाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा विधानसभा एकत्र लढवणार असल्याचं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनोज आखारे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, गंगाधर बनबरे संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हे मान्यवर उपस्थित होते.
मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मुुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
लढवय्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती तसेच, संंविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्याकडे काही नसता सोबत आलात त्यामुळे त्यांचं कौतुक करतो. शिवप्रेमी असल्याने रक्त एकच आहे. दुहीच्या शापाला गाढून टाकू. एकत्र येत नवा इतिहास घडवू. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून युती नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ठ केलं आहे.
Read also
- “मला घरी जायचं आहे..माझे प्रश्न लवकर घ्या”; केसरकरांच्या विनंतीने सभागह आवाक
- गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’; सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा
- देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार?
- छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बीडीडी चाळीसंदर्भात एक मोठी घोषणा