मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला होता. त्यावर नितेश राणे रात्रीच पत्र लिहतात की काय, हे मला समजत नाही. कारण मला एक प्रश्न पडतो की, आतापर्यंत तुम्ही ज्यांना भ्रष्ट म्हणत होतात, त्या सर्वांना सोबत घेतले आहे. त्यांचे काय करणार याचे उत्तर द्या, असं किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणे यांना चांगलच सुनावलं आहे.
छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार
सगळ्या बाजूंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवले जात आहे. मात्र मी तुम्हाला आज सांगतो, की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच जिंकणार आहेत. तुम्ही अनेक पक्ष फिरून येणार आणि नंतर ज्या पक्षात राहणार त्यांच्यासाठी गळे काढणार, असा टोला पेडणेकर यांनी राणेंना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बीडीडी चाळीसंदर्भात एक मोठी घोषणा
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. पण आमच्याय काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या प्रयत्नाना यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाकाची चौकशई करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. पण हे विसरु नये की, 25 मधील 20 वर्षे ते आमच्या सोबतच होते. स्थायी समितीमध्ये भ्रष्ठाचार आहे तर मग यशवंत जाधवांना सोबत का घेतलं, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.
“मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?”
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहले आहे. प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी आहे याची आठवण नितेश राणे यांनी आयुक्तांना करून दिली आहे. महापालिकेचे प्रशासक म्हणुन आपलम अधिकार हे केवळ बदली करता मर्यादित नसून अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रातुन केली आहे.
Read also