मुंबई : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील आघाडीवरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे यांच्यात दम नसल्याची टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
“मला घरी जायचं आहे..माझे प्रश्न लवकर घ्या”; केसरकरांच्या विनंतीने सभागह आवाक
प्रत्येक व्यक्ती बाहेर पडून संघर्ष करते. स्वत:ला सिद्ध करते. संभाजी ब्रिगेडचे काम जोरात आहे. त्यांना उभा महाराष्ट्र जाणतो. त्यांच्या प्रती आदर आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही. दम असता तर ते घरात बसले नसते, असा खोचक टोला खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’; सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सातत्याने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाहीर वक्तव्य करत असतात. या आधीही त्यांनी अशी टीका अनेक वेळा केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राणा दाप्मत्यावर कारवाई केली होती. त्यांना मुंबईत अटक करण्यात आली होती. कोठडीत सन्मानीय वागणूक मिळाली नसल्याची ओरडही राणा यांनी केली होती.
देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार?
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युती बाबत, लढवय्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती तसेच, संंविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्याकडे काही नसता सोबत आलात त्यामुळे त्यांचं कौतुक करतो. शिवप्रेमी असल्याने रक्त एकच आहे. दुहीच्या शापाला गाढून टाकू. एकत्र येत नवा इतिहास घडवू. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून युती नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read also
- “काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत मात्र सभागृहाच्या पायऱ्यांवर जोर जोरात बोंबलतात”
- “राष्ट्रवादीची ‘बी’ टीम ब्रिगेड बरोबर राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम नवाब सेनेची युती”; मनसेचा शिवसेनेला टोला
- “नितेश राणे रात्री पत्र लिहतात काय?”; किशोरी पेडणेकरांचा राणेंना टोला
- “फुसक्या बारला युवराज वगैरे म्हणू नका”
- “शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार”; उद्धव ठाकरेंची मोेठी घोषणा