मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोशल मीडियाद्वारे आदरांजली वाहिली जात आहे. राजीव गांधींच्या पुण्यतिथी निमित्ताने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांचा फोटो शेअर करत आदरांजली वाहिली आहे.
यशोमती ठाकूर यांनी राजीव गांधी यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेचे फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील जोरदार टोला लगावत राजीव गांधींच्या जीवनचरित्रातून बोध घ्यावा, असा सल्ला देखील दिला.
राजीव गांधी यांच्या शेवटच्या पत्रकारपरिषदेचा फोटो. आपल्या विचारांवरील श्रद्धेसाठी जिवाचं बलिदान द्यावं लागलं तरी मी संकोच करणार नाही असं राजीवजी बोलायचे. मेरा क्या है झोला उठाके चल दूँगा टाइप नेत्यांनी खरंच राजीवजींच्या जीवनचरित्रातून बोध घ्यायला हवा ! pic.twitter.com/jWNFt3qkL7
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 21, 2021
यशोमती ठाकूर फोटो शेअर करत म्हणाल्या की, राजीव गांधी यांच्या शेवटच्या पत्रकारपरिषदेचा फोटो. आपल्या विचारांवरील श्रद्धेसाठी जिवाचं बलिदान द्यावं लागलं तरी मी संकोच करणार नाही असं राजीवजी बोलायचे. मेरा क्या है झोला उठाके चल दूँगा टाइप नेत्यांनी खरंच राजीवजींच्या जीवनचरित्रातून बोध घ्यायला हवा, असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना नाव न घेता लगावला.
दरम्यान, 21 मे 1991 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान चेन्नईजवळ लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत राजीव गांधी यांची हत्या केली होती. राजीव गांधी यांनी घेतलेले काही निर्णय आजही देशासाठी महत्त्वाचे ठरत आहे. त्यांनी मतदान करण्याची वयमर्यादा कमी केली होती. तसेच देशातील कॉम्प्युटर क्रांती आणि पंचायतीराज व्यवस्थेचा पायासाठी देखील त्यांना ओळखले जाते.
Read Also :
- ‘गुजरातला हजार कोटी व महाराष्ट्राला काहीच नाही, हा सापत्नभाव फडणवीसांना तरी पटेल काय?’
- ‘…म्हणून पंतप्रधान मोदींनी गुजरातला तात्काळ मदत जाहीर केली’
- पोलीस भरतीबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- गृहमंत्री वळसे-पाटील
- तौक्ते चक्रीवादळ : मुख्यमंत्री ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला आज भेट देणार, असा असेल दौरा
- ‘ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवणार’