मुंबई : राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली दिली होती. यानंतर आता पोलीस भरतीबाबत देखील लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
गेली २-3 वर्षांपासून पोलीस भरती रखडली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने भरती प्रक्रियेवर याचा परिणाम झाला. मात्र, आता याबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, hदोन्नतीचा विषय मार्ग लावला आहे. आता पोलीस भरतीबाबत आम्ही काम करतोय. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु.
गृहमंत्र्यांनी तौक्त चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीर केंद्र सरकारन गुजरातला केलेल्या मदतीबाबत देखील भाष्य केले. केंद्राने गुजरातला मदत केली याबद्दल तक्रार असण्याचे काही कारण नाही. मात्र, त्यासोबत महाराष्ट्रालाही मदत मिळायला हवी, असे वळसे पाटील म्हणाले.
Read Also :
- तौक्ते चक्रीवादळ : मुख्यमंत्री ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला आज भेट देणार, असा असेल दौरा
- ‘ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवणार’
- मराठा आरक्षणाबाबत फडणवीस आणि भाजप दोघेही ‘डबल ढोलकी’
- ‘…तेव्हा साहेबांच्या खिशातील पेनाची शाही संपली होती का?’
- नितीन राऊत राजीनामा द्या! मराठा समाजाची आक्रमक मागणी