मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत आज दिल्लीत आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली. आप आणि कॉंग्रेसमध्ये दिल्ली, गुजरात, हरियाणा, गोवा, चंदीगड आणि पंजाब राज्यात लोकसभा जागावाटप करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा…“कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील”, चाकणकरांनी पुन्हा सुळेंना डिवचलं
दिल्लीत लोकसभेच्या एकूण सात जागा असून यामध्ये कॉंग्रेस ३ तर आप चार जागांवर निवडणुक लढणार आहे. तर गुजरातमध्ये एकूण २६ जागापैंकी कॉंग्रेस २४ तर दोन जागा आपला सोडल्या जाणार आहेत. यातच हरियाणा राज्यात एकूण दहा जागा असून कॉंग्रेस ९ तर एक जागा आप लढविणार आहे. गोव्यात एकूण दोन जागा असून दोन्ही जागा कॉंग्रेस लढवणार आहे. तसेच चंदीगडमध्येही कॉंग्रेस एक जागा लढवणार आहे. यातच पंजाब राज्याची सत्ता आम आदमी पक्षाकडे असल्याने याठिकाणी सर्व जागा आम आदमी पक्ष लढविणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा अन् मगच…”राज्याच्या मंत्र्याने इंडिया आघाडीला दिलं आव्हान
INDIA आघाडी अंतर्गत जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन. भारतातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याच्या दृष्टीने हि अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. मला खात्री आहे कि आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते “फॅसिस्ट” भाजप पार्टीला सत्तेतून उखडून फेकून देण्यासाठी पूर्ण ताकदीने लढतील. शेवटी जिंकणार तर INDIA च !!! असा विश्वास आपचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस व आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे आघाडीची घोषणा आज दिल्लीत झाली.
दिल्ली : काँग्रेस- 3, आप- 4
गुजरात : काँग्रेस- 24, आप- 2
हरियाणा : काँग्रेस- 9, आप- 1
गोवा : काँग्रेस- 2, आप- 00
चंदीगड : काँग्रेस- 1, आप- 00
पंजाबमध्ये आघाडी नाही. 13 जागा आप लढणार
READ ALSO :
हेही वाचा…“ते काय हळदीकुंकू आहे का, भांडण झालं म्हणून जायचं नाही ?”सुळेंवर टिका करणाऱ्या चाकणकरांची हवाच काढली
हेही वाचा…“तुतारी एका संघर्षाची सुरूवात करण्याची प्रेरणा”, शरद पवारांनी रायगडावरून शड्डू ठोकला
हेही वाचा…“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
हेही वाचा.“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
हेही वाचा…“आमदार आहेस, लय गल्लीतल्या गप्पा मारू नकोस, बाजारू विचारवंत,” पवार गटाने मिटकरींची बोलतीच केली बंद