मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील कोरोना बाधितांती संख्या 20 झाली आहे. दरम्यान, यापूर्वी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या 20 झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनची रूग्णसंख्या झापाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच हिवाळी अधिवेशानंतर देखील अनेक राजकीय नेते मंडळी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही; संजय राऊतांचा पंजाब प्रकरणावरून गंभीर इशारा
कोरोना संसर्ग, रुग्णसंख्या, त्यातील वाढ आणि परिणामांची माहिती घेत खबरदारी म्हणून योग्य वेळी, योग्य निर्णय घ्यावा व गरज असेल तर निर्बंध वाढविण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले. लोकांची गर्दी आणि वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त करताना राजकीय व अराजकीय कार्यक्रम थांबविण्याबाबत पवार यांनी बजावल्याचेही सांगण्यात आले.
‘घटिया सोच’ म्हणताच खासदार प्रियांका चारतुर्वेदींनी आमदार राम सातपुतेंना केलं ब्लॉक
पवार यांच्या सूचनेनंतर आता राज्य सरकार तातडीने पावले उचलून उपाय करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी पवार यांची भेट घेतली. राज्यातील या आजाराची प्रमुख्याने रुग्णवाढीची कारणे, त्याचे प्रमाण, सरकारने केलेल्या उपाययोजना, सरकारी, खासगी रुग्णांतील उपचार व्यवस्था, संभाव्य निर्बंध आणि त्याची परिणामकारकता या बाबींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
Read also:
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचा सत्तारूढ गटाला धक्का; आमदार प्रकाश आवाडेंचा पराभव
- काँग्रेसने कमरेखालचे वार करणं सोडून द्याव; पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरून विक्रांत पाटील कडाडले
- सत्तार-दानवेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण; सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते संभ्रमात का?
- मोदींच्या पुण्याईमुळे निवडून येतात म्हणणाऱ्या भुजबळांवर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…
- सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊन नाही, रुग्ण वाढले तर कठोर पावलं उचलू – महापौर किशोरी पेडणेकर