मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यात एवढी मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो. सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगले काम केल्याचे ठिकठिकाणी ऐकायला मिळते. प्रदेशाध्यक्षांनी देखील सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना व जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. असं मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं आहे.
“वेळ पडली तर मंत्र्यांच्या गाड्या देखील फोडू”; ओबीसी संघटनेने सरकारला दिला इशारा
एक म्हणजे पक्ष संघटना म्हणून पुढील अडीच वर्षात आपल्याला कष्ट करायचे आहेत. मी आताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगत होतो की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आपण १९९९ साली केली. आज २३ वर्षांचा कालखंड झालेला आहे. या २३ वर्षात साडे सतरा वर्षे राज्यात सत्तेत होतो. भाजप स्थापनेपासूनचा कालखंड पाहिला तर सव्वा पाच वर्षांचा सत्तेचा कालखंड आहे. त्यामुळे सत्ता नसली तरी चिंता करण्याची गरज नाही. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की, सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा असतो. सत्तेत असताना आपण अनेक निर्णय घेतो, धोरणं आखतो. त्याची माहिती घेण्याची साधने काय? तर तालुका स्तरावरील अधिकारी जिल्हा, राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत अहवाल पाठवतात. तो शंभर टक्के खरा असतो असे नाही. पण सत्ता नसताना थेट लोकांमध्ये जाता येतं. दौरे करताना अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात, त्यातून अनेक प्रश्न समजतात. असंही ते म्हणाले.
“मला गद्दार म्हणा किंवा अजून काही, माझी प्रतिक्रिया तीच राहणार”; उदय सामंतांची पत्राद्वारे भूमिका
दुसरी गोष्ट अशी की, सत्ता नसताना पक्ष संघटना अधिक प्रभावी करता येते. आपण सत्तेत नसताना आज एकत्र आलेलो आहोत. पक्ष संघटना आणखी कशी वाढवायची यासंबंधीची चर्चा करायची होती. अनेक सदस्यांनी याबाबत आपले मत मांडले. निवडणुकांचा उल्लेख काहींनी केला. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरु आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, असे वक्तव्य केले आहे. ओबीसींना घेऊनच निवडणुका झाल्या पाहीजेत, हा आपला दृष्टीकोन असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. ओबीसींना बाजूला ठेवून निवडणुका होता कामा नयेत. यानिमित्ताने नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची जबरदस्त शक्ती उभी करण्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या निवडणुकांमध्ये नेतृत्वाची नवी पिढी तयार करण्याची, तसेच समाजातील सर्व घटकांना आणि तरुणांना संधी कशी देता येईल, याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आजच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष, निरीक्षक उपस्थित होते.
सदा सरवणकरांचा सेनेला जय महाराष्ट्र; फाटक, शहांची शिवसेनेतुन हकालपट्टी
महाराष्ट्रात महसूल खात्याचे सहा विभाग आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून या विभागांप्रमाणे संघटनेची जबाबदारी काही लोकांकडे द्यावी. ज्यांच्यावर जबाबदारी असेल त्यांनी आपल्या विभागावर संपूर्ण लक्ष ठेवून काम करावे. याचपद्धतीने महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक न्याय आणि ओबीसी विभागाने देखील काम करावे. मुंबईतही प्रभावीपणे काम करावे. हे सर्व उत्तमरीत्या झाले तर चित्र नक्कीच बदलेल. राज्यात एवढी मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो. सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगले काम केल्याचे ठिकठिकाणी ऐकायला मिळते. प्रदेशाध्यक्षांनी देखील सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना व जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे, असे आवाहन यानिमित्ताने करतो.
Read also
- कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
- भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; तात्काळ पदावरून काढलं
- पाहिला.. पाहिला.. पाहिलो वो, माझा देव कुणी पाहिला; चिमुकल्याला फडणवीसांची भुरळ
- साहेब तुमच्या पत्राने शंभर हत्तीचं बळ मिळालंय; आमदार राहुल पाटलांचे उद्धव ठाकरेंना पत्र
- “पवार साहेबांनी भाजपचा अश्वमेध रोखला”