मुंबई : राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील 27 टक्के आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत पुढील निर्णय येईपर्यंत राज्यात नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करू नये असे महत्वपुर्ण निर्देश देण्यात आले. त्याची पुढील सुनावणी ही 19 जुलै रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी व्हिजेएनसटी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे.
“माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु मला तुमची ताकद हवीय”
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असताना राजकीय नेते एकमेकांवर ढकलाढकलीची कामे करीत आहेत. यामध्ये राज्य केंद्रावर आरोप करतंय तर केंद्र राज्यांवर आरोप करण्यामध्ये अडीच वर्ष वाया गेलेली आहेत. महाराष्ट्रातील राजकीय आरक्षण जे गेलं तर याच्यापेक्षा उद्रेक कुठलाचा होणार नाही, असा इशारा बाळासाहेब सानप यांनी राज्य सरकारला दिला आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आलं तर आम्ही ओबीसी शिवाय कोणत्याही निवडणुका घेणार नाहीत. ही त्यांनी भुमिका त्यांनी घेतली आहे. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर देखील उतरणार आहे. तसेच मंत्र्यांच्या गाड्या देखील फोडायला मागे पुढे बघणार नाही. असा इशारा देखील बाळासाहेब सानप यांनी दिला आहे.
“प्रशासनाला विनाकारण ताण येईल, असं काहीही करू नका”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
काही दिवसांपुर्वीच राज्यात 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यावर देखील राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणानुसार उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत विचार करून निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश आता गुजरात अन् गोवामध्ये देखील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात
दरम्यान, गेल्या काही वर्षापासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. अजूनपर्यंत त्यावर राज्य सरकारला ठोस उपाययोजना करता आली नाही. जो पर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाहीत अशी भूमिका राजकीय नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीत म्हणजे 19 जुलै काय निर्णय होतो त्यावर लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “मला गद्दार म्हणा किंवा अजून काही, माझी प्रतिक्रिया तीच राहणार”; उदय सामंतांची पत्राद्वारे भूमिका
- सदा सरवणकरांचा सेनेला जय महाराष्ट्र; फाटक, शहांची शिवसेनेतुन हकालपट्टी
- “द्रौपदी मूर्मूंना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला नाही”; राऊतांनी भाजपला डिवचलं
- “आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखा नेता”; विधान परिषदेच्या विरोधी पदासाठी सेना, राष्ट्रवादीमध्ये चुरस
- “तुमच्याकडे फक्त सहा महिन्याचं आयुष्य, शरद पवारांनी पैज लावली अन् ती जिंकलीही”