मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील काळात पाच वर्षे विरोधात काढली. त्यानंतर झालेल्या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ५४ आमदार निवडून आणले. आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने, कल्पकतेने, दूरदृष्टीने राज्यात नवे सरकार स्थापन झाले. भाजप पक्षाला पवार साहेबांनी पुन्हा आव्हान दिले. हे आव्हान दिल्लीतील लोकांना रूचले नाही व पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी झाला. देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कोणी थांबवत नव्हते. मात्र महाराष्ट्रात पवार साहेबांनी हा अश्वमेध रोखला. असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
“तुमच्याकडे फक्त सहा महिन्याचं आयुष्य, शरद पवारांनी पैज लावली अन् ती जिंकलीही”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला. या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची सद्यपरिस्थिती काय आहे याचा आढावा मांडला. ते म्हणाले की, ” पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करुन दाखवत राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन केले. या कृतीतून महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, हा विश्वास त्यांनी निर्माण केला.”
“माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु मला तुमची ताकद हवीय”
राज्यातील सर्व यंत्रणा विरोधकांना झुकविण्यासाठी वापरात आणली जात आहे. त्यामुळे आता केवळ न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास राहिला आहे. पुढील काळात पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे यावा यासाठी लोकांच्या मनाला गवसणी घालायला हवी. विरोधात राहूनही सत्ताधारी जे करू शकत नाहीत ते राष्ट्रवादी करून दाखवत आहे, असं सामान्य गोरगरीब माणसाला वाटलं पाहिजे.
“प्रशासनाला विनाकारण ताण येईल, असं काहीही करू नका”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
यासाठी रस्त्यावर येऊन लोकांचे प्रश्न मांडण्याची तयारी आपण ठेवायला हवी. आपण प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करायला हवे. प्रत्येक समाजाला सोबत घेऊन पुढे जायला हवे. हे सगळं केलं तर २०२४ हे वर्ष आपलंच असेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, खासदार सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्माबाबा आत्राम, प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक प्रदेश इत्यादी उपस्थित होते.
Read also
- “वेळ पडली तर मंत्र्यांच्या गाड्या देखील फोडू”; ओबीसी संघटनेने सरकारला दिला इशारा
- “मला गद्दार म्हणा किंवा अजून काही, माझी प्रतिक्रिया तीच राहणार”; उदय सामंतांची पत्राद्वारे भूमिका
- सदा सरवणकरांचा सेनेला जय महाराष्ट्र; फाटक, शहांची शिवसेनेतुन हकालपट्टी
- “द्रौपदी मूर्मूंना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला नाही”; राऊतांनी भाजपला डिवचलं
- “आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखा नेता”; विधान परिषदेच्या विरोधी पदासाठी सेना, राष्ट्रवादीमध्ये चुरस