मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सोबत असलेल्या 15 आमदारांना एक भावनिक पत्र लिहिले होते. शिवसेनेतील होणारी फुट रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे सोबत असणाऱ्या आमदारांचं कौतुक करत सोबत राहिल्याने त्यांचे आभार मानले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी उद्दव ठाकरे यांच्या पत्रावर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
“आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखा नेता”; विधान परिषदेच्या विरोधी पदासाठी सेना, राष्ट्रवादीमध्ये चुरस
उद्धव ठाकरे यांच्या पत्रातून आम्हाला आता शंभर हत्तीचे बळ मिळाले असल्याचं राहुल पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक पत्र देखील लिहिलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शिवसेना हा आपला परिवार आहे. या परिवारास अघोरी दृष्ट लागलीय. आपण मुख्यमंत्रीपद स्वाभिमानाने सोडले. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांची ढाल म्हणजेच शिवसेना. आपल्या उमेदीच्या वयातच या विचाराने आम्ही तेजाळून गेलो आहोत. त्यामुळे आणखी कुठलीही अपेक्षा नाही. शिवसेनेची निष्ठा हेच आमचे सर्वस्व आहे. या लढाईत आपण स्वतः काळजी घ्यावी. परभणी जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ता आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असं आमदार राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे म्हटले आहे.
“तुमच्याकडे फक्त सहा महिन्याचं आयुष्य, शरद पवारांनी पैज लावली अन् ती जिंकलीही”
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त 15 आमदार राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या 15 आमदारांना देखील स्पष्ट सांगितलं आहे की कुणाला जायचं असले तर बिनदास्त जा. मात्र तरी देखील ते आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. त्यांच्यासाठी अलिकडेच त्यांनी पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय.
“माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु मला तुमची ताकद हवीय”
याचबरोबर, शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो.असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिलेल्या पत्रात म्हटले होते.
Read also
- “पवार साहेबांनी भाजपचा अश्वमेध रोखला”
- “वेळ पडली तर मंत्र्यांच्या गाड्या देखील फोडू”; ओबीसी संघटनेने सरकारला दिला इशारा
- “मला गद्दार म्हणा किंवा अजून काही, माझी प्रतिक्रिया तीच राहणार”; उदय सामंतांची पत्राद्वारे भूमिका
- सदा सरवणकरांचा सेनेला जय महाराष्ट्र; फाटक, शहांची शिवसेनेतुन हकालपट्टी
- “द्रौपदी मूर्मूंना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला नाही”; राऊतांनी भाजपला डिवचलं