सांगली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे सातत्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त पूरग्रस्त भागांना भेटी देत आहेत. तळीये गावाचा दौरा केल्यावर या दोघांनी चिपळूण शहराचा आणि सातारा जिल्ह्याचा दौरा केला, आज कराडमध्ये पाहणी केल्यानंतर ते सांगलीला रवाना झाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वाळवा गावाला भेट दिली.
“मुख्यमंत्री जिथे कोयनेला पोहोचू शकत नाहीत, तिथे ते दिल्लीला काय पोचणार?”, मनसेकडून बोचरी टीका
इथे त्यांनी, विविध ठिकाणांना भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कंबरेएवढं पाणी या गावात होतं. घरांची अवस्था वाईट होती. सर्व वस्तूंचे नुकसान झालं आहे, असं त्यांनी सांगितलं.
“केंद्राने जाहीर केलेल्या निधीचा आणि सध्याच्या पुराचा काहीही संबंध नाही” अजित पवारांचा पंचनामा
या भेटीबाबत त्यांनी ट्विट करून, “काही ठिकाणी पडझड झाली आहे. शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मनुष्यहानी टळली, हेच सुदैव! ७० एकर जागेत आमचं पुनर्वसन करण्यात यावं, अशा प्रकारच्या स्थानिकांच्या मागण्या आहेत. आपल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडे मांडण्यात येतील,” असं आश्वासन दिलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. संजयकाका पाटील, सदाभाऊ खोत, पृथ्वीराजबाबा देशमुख हे सारेच माझ्यासोबत या पाहणीच्यावेळी उपस्थित होते.#MaharashtraFloods #sangli #floods pic.twitter.com/zWgg9g4GkE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 29, 2021
यावेळी, “पूरग्रस्तांवरील संकट मोठं असून, सरकारने त्यांना तातडीने मदत द्यावी सरकार पॅकेज जाहीर करणार आहे, असं ऐकलं आहे, ते द्याच! पण आता लोकांना तातडीची हवी आहे, ती सरकारने त्वरित द्यावी. तसेच, मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सोबत घेऊन बसावं आणि मदतीबाबत निर्णय घ्यावा,” असा सल्ला देत, “बहाणेबाजी बंद करून जबाबदारी घ्या! आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मदत दिली होती. त्यामुळे, ठाकरे सरकारनेही केंद्राकडे बोट करण्याआधी स्वत: मदत देऊ करावी,” असा घणाघात केला.
“पर्यावरणमंत्री म्हणून तुम्ही काय केलंत?” संतप्त चिपळूणकरांचा विचारला आदित्य ठाकरेंना जाब
दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टीने आतापर्यंत २१३ लोकांचा मृत्यू झाला असून, ८ जण बेपत्ता आहेत. तर ५२ लोक जखमी झाले असून, ४०० जनावरे आणि ६० हजार कोंबडय़ा दगावल्या आहेत. अतिवृष्टीमुळे १४०० गावांना फटका बसला असून, पूरग्रस्त भागातील ४ लाख ३५ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोकणातील एकूण १०४९ गावातील ८ हजार २३७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, १२०० घरांना फटका बसला आहे.
Read Also :
- अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात यादिवशी जमा होणार १० हजारांची मदत, वडेट्टीवारांनी केली मोठी घोषणा
- मोठी बातमी : २५ जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, ११ जिल्ह्यांमध्ये मात्र लेव्हल तीनचे नियम कायम
- तर ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा
- “पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा”, सोशल मीडियावर मोहीम सुरु
- “कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका