मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जीवनावर आधारीत असेलेल्या ‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवाद असेलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली.
महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे; शिवसेनेकडून राणांना खोचक टोला
अमित शाह यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी अतिशय बारकाईन त्या राज्याचा अभ्यास केला. सर्व निवडणुका लढण्याचा त्यांचा निर्णय हा उत्तर प्रदेशातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. 80 पैकी 73 जागा जिंकण्याचा विक्रम त्यातून साकारला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अतिशय सखोल अभ्यास अमित शहा यांनी केला असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदींनीच सांगितलं की, पवारांच्या हाताला धरून राजकारण शिकलो, मग यात जातीयपणा कसला?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी देश- विदेशातून संदर्भ गोळा केले. या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे आहे. मात्र अमित शहा यांची निर्णय क्षमता अतिशय मोठी आहे. स्वत: दौरे करून अभ्यास करायचा आणि निर्णय घ्यायचा, हे त्यांचे वैशिष्ट. असंही ते म्हणाले. काश्मिरच्या 370 चा निर्णय शक्य करून दाखविला. भाषण नाही तर कृतीत आणून दाखविणारे फार कमी नेते आहेत. त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आपले नेते आहे. आजकल गदाधारी हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात. परंतु रोज सकाळी टिव्ही पाहिला की ते गधाधारी दिसते, असा टोला देखील त्यांनी लगावला.
देशमुखांना दिलासा मिळण्याची शक्यता! गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला चांदिवाल आयोगाचा अहवाल
दरम्यान, या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सुप्रसिध्द अभिनेत्री पल्लवी जोशी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, अतुल भातखळकर, उदय निरगुडकर, रमेश पतंगे अनिर्बान गांगुली, शिवानंद द्विवेदी, डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यावेळी उपस्थित होत्या.
Read also:
- अखेर 18 दिवसांनी गुणरत्ने सदावर्तेंची तुरूंगातून सुटका! म्हणाले, “मी मरायला देखील तयार आहे…;”
- ..तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
- नवनीत राणांचा ‘डी गॅंगशी’ आर्थिक व्यवहार! संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ
- आधी पाणी नाकारलं, वाद केल्यानंतर तो शांत करण्यासाठी चहा दिला का? भाजपचा राज्य सरकारला सवाल
- “राणांचं समर्थन करणारा राज्यातील विरोधी पक्षही तोंडघशी पडला”; संजय राऊतांचा खोचक टोला