मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना भडकावण्याप्रकरणी अॅड गुणरत्ने सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर सोलापुर,कोल्हापुर बीड, अकोला मुंबई अशा विविध शहरांत गुन्हे दाखल केले होते. जवळपास त्यांची 18 दिवसांनी तुरूंगातून सुटका करण्यात आली. तुरूंगातुन बाहेर पडताच त्यांनी अनेक दावे करीत यापुढेही लोकांसाठी संघर्ष करणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मोदींनीच सांगितलं की, पवारांच्या हाताला धरून राजकारण शिकलो, मग यात जातीयपणा कसला?
त्याआधी मराठा आरक्षणाबाबत दोन गटांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य गुणरत्ने सदावर्ते यांनी केलं होतं. या प्रकरणी त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मंगळवारी त्यांना पुणे पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला. तसेच अन्य प्रकरणात देखील त्यांना यापुर्वीच जामीन अर्ज मंजूर करण्यात आला होता. त्यांना 25 हजार हमीवर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून 4,5 आणि 6 मे रोजी पुणे पोलिसांसमोरर हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
देशमुखांना दिलासा मिळण्याची शक्यता! गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला चांदिवाल आयोगाचा अहवाल
तुरूंगात आपण फक्त पाण्यावर होतो, असा दावा देखील गुणरत्ने सदावर्ते यांनी केला आहे. तसेच सरकारला काय करायचं ते करू दे परंतु तत्व सोडायची नाहीत. तुरूंगातमध्ये गेल्यापासून मी फक्त पाण्यावर दिवस काढले. येणाऱ्या काळात कष्टकऱ्यांसाठी लढणार आहेत. त्यासाठी माझी कितीही मुस्कटदाबी केली तरी मी मागे फिरणार नाही. मी यासाठी मरायाला देखील तयार आहे, असं गुणरत्ने सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी जातपात पाळत नाही. लाखो मराठा बांधव माझ्यासोबत आहेत. मला जातीसोबत जोडू नका, मी मराठा समाज म्हणून विरोध केलेला नाही. असंविधानिक पद्धतीने जे आरक्षण देण्यात आलं होतं. त्याला मी विरोध केला होता. असंही गुणरत्ने सदावर्ते यांनी सांगितलं आहे.
Read also:
- ..तर या अब्दुल सत्तारांना तुरूंगात डांबून दाखवा; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
- नवनीत राणांचा ‘डी गॅंगशी’ आर्थिक व्यवहार! संजय राऊतांच्या आरोपांमुळे खळबळ
- आधी पाणी नाकारलं, वाद केल्यानंतर तो शांत करण्यासाठी चहा दिला का? भाजपचा राज्य सरकारला सवाल
- “राणांचं समर्थन करणारा राज्यातील विरोधी पक्षही तोंडघशी पडला”; संजय राऊतांचा खोचक टोला
- महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे; शिवसेनेकडून राणांना खोचक टोला