कोल्हापुर : मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्यानंतरही सत्तेपासून दुर राहावं लागलं. शिवसेनेने अचानक भाजपशी युती तोडत राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं. त्यानंतर विरोधकांनी फडणवीसांना डिवचण्यास सुरूवात केली. त्यावर आता पुन्हा एकदा त्या विधानाचा उल्लेख फडणवीसांकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…Big News: शरद पवार यांचा मोठा निर्णय, अध्यक्षपदावरुन निवृत्ती
सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी धुमधडक्यात प्रचार सुरू आहे. काॅंग्रेससह भाजपने देखील या प्रचारासाठी महत्वाचे नेते मैदानात उतरवले आहेत. यातच कोल्हापुर सीमाभागात देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जुन्या वक्तव्याची आठवण करीत मी पुन्हा येईन, ते कसा येतो हे तुम्हाला देखील माहिती आहे. असं म्हटलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्यने मुख्यमंत्री होण्याचे षडयंत्र रचले”
दरम्यान, कर्नाटकात आज अनेक विकास कामे झाली आहेत. मात्र एक पैशाची दलाली कोणाला द्यावी लागली नाही. लॉकडाऊनच्या काळात नरेंद्र मोदीच भारतीयांच्या पाठीशी उभे राहिले. मागच्या वेळी भाजपला थोड्या जागा कमी पडल्या तर बाकीच्यांची सर्कस सुरू झाली. विकासाची गाडी फक्त मोदींसोबतच पुढे जाऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अॅक्शन प्लॅन तयार, पुढचा अध्यक्ष ठरला, बैठकीत दोन प्रस्ताव ?”
हेही वाचा…अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘सुपडा साप’
हेही वाचा…‘आता लोकांची खात्री पटली, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली’
हेही वाचा…फॅक्ट चेक : निगडीतील शिवसृष्टीला तर महाविकास आघाडीच्या काळातच ‘खोडा’
हेही वाचा…शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली! मोठी घोषणा करताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर