नवी दिल्ली : 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानंतर घडलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या राजकीय नाट्यबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी परवानगी दिली तसेच त्यांच्यासोबत माझी बैठक देखील पार पडली होती, असा खुलासा फडणवीस यांनी केला आहे. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…२०२४ चा मुख्यमंत्री कोण? “शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवू पण.”. देवेंद्र फडणवीसाचं मोठं विधान
सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि भाजप युतीसंदर्भात बैठक झाली होती. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा असणार असं स्पष्ट केलं होतं. शपथ विधीच्या तीन ते चार दिवसानंतर भूमिका बदलली असं सांगत असतील तर त्यांनी पहाटेची शपथ का घेतली. ? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. तसेच राजकारणात गुगली कशी टाकायची हे माहिती होती. कारण बीसीसीआयच अध्यक्ष पद सांभाळलं होतं. असं म्हणत यात देवेंद्र फडणवीस यांचीच विकेट गेली. असा टोलाही शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
मी जाहीर बोललो होतो की तुम्हाला सरकार बनवायला संख्याबळ कमी पडले तर राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देईन. ते देण्याबाबत काही कारणे होती. २०१९ मध्ये अनेक गोष्टींची चर्चा झाली होती हे खरे होते..मी निर्णय बदलला हे माहीत होते तर मग पहाटे शपथ का घेतली? पहाटे लपून शपथ का घेतली? असा सवालही त्यांनी केला. माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले? सत्तेसाठी त्यांची कुठेही जाण्याची तयारी आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही हे स्पष्ट केले. गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली.. विकेट गेलेला माणूस विकेट गेली कसे सांगतो?
हेही वाचा…“जयंत पाटलाचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार, अजित पवारांच्या नावाची बैठकीत चर्चा”
दरम्यान, ” २०१९ साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी सुरू केली होती. त्यावेळी आम्ही संपर्क केल्यानंतर ते आमचे फोन देखील घेत नसल्याने हे काही आता आपल्यासोबत येणार नाहीत हे समजून घेतलं. त्यामुळे आमच्याकडे असणाऱ्या पर्यायांची चाचपणी सुरू केली, त्याचवेळी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी आमच्याशी संपर्क करत महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली होती”, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नाशिकमध्ये पहिला लढा ठाकरेंनी जिंकला, शिंदे गटाला कोर्टाचा मोठा दणका दिला”
हेही वाचा…कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत फडणवीसांचं सुचक विधान, भाजप-शिंदेंचे संबंध ताणले होते
हेही वाचा…“सरकार पडेल, पण मिंधे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही”, आदित्य ठाकरेंनी शिंदेंना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…“काही दिवस आम्ही, काही दिवस…,” पुढचा मुख्यमंत्री कोण असणार ? फडणवीसांच्या विधानानंतर शिंदे गटाची भूमिका
हेही वाचा…“अधिक आक्रमक व्हा, कामगिरी सुधारा,” फडणवीसांनी बैठकीत भाजप मंत्र्यांना झापलं