मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीची युती होण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण असणार ? या प्रश्नावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची आता एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“अशी पुन्हा कावकाव केली तर..” राष्ट्रवादीकडून भगिरश भालकेंचा जोरदार समाचार
देवेंद्र फडणवीस यांनी काल एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाबाबत अनेक गौप्यस्फोट केलेत. यातच त्यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण असणार त्यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०१४ ची निवडणुक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो. त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात.
हेही वाचा…भीम आर्मीचे प्रमुखांवर जीवघेणा हल्ला, अज्ञात व्यक्तींकडून चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीवर
परंतु पक्षाला वाटलं. तर वेगळा निर्णय घेतला जाईल. मात्र, नेत्याच्या नेतृत्वात निवडणुका लढवणं आणि निवडणुकांनंतर त्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात असं विचारले असता. ते म्हणाले की, जर त्या वेळी आमच्या पक्षाला कोणता दुसरा निर्णय घ्यायची गरज असेल, तर तो निर्णय घेईल. पण मला वाटत नाही की दुसरा कुठला निर्णय घेण्याची गरज आहे. कोण मुख्यमंत्री असणार हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना विचारायला हवं. भाजपमध्ये सगळे निर्णय संसदीय समिती घेते असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“जयंत पाटलाचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार, अजित पवारांच्या नावाची बैठकीत चर्चा”
हेही वाचा…“भाजपसाठी राष्ट्रवादी हा बी प्लॅन, भाजप-राष्ट्रवादी युती फिक्स होती,” फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा हादरा, राष्ट्रवादीचा एकमेव आमदार एकनाथ शिंदेंच्या वाटेवर
हेही वाचा…होय, माझी शरद पवारांसोबत बैठक झाली होती..! अखेर फडणवीसांनी फोडला राजकीय बॉम्ब
हेही वाचा…“भिडेंना काय कर्णाने दान केलेलं कर्ण कवच सापडलं आहे का ?” जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल