सोलापूर : पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते भगिरथ भालके यांनी आज भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. याचा मोठा धक्का राष्ट्रवादी काॅंग्रेसला बसण्याची शक्यता आहे. यातच आज भगिरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यावर आता उमेश पाटील यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“राज्यातील साडेबारा कोटी जनतेला ५ लाखांचा आरोग्य विमा”, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित भगिरथ भालके यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. त्याआधी राष्ट्रवादी सोडून बीआरएस पक्षात गेलेले भगिरथ भालके हे विधानसभेला कसे निवडून येतात, तेच आम्ही बघतो, असा थेट इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला होता. त्यावर कालचा पोपट बोलून गेला, परंतु उद्यापासून भालके काय चीज आहे, त्याला दाखवून देतो. असं म्हणत भगिरथ भालके यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला.
हेही वाचा…“गुणरत्ने सदावर्ते मनोरूग्ण, गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”
बीआरएसमध्ये नवीन गेलेल्या नेत्यांनी मोहोळचा पोपट आणि सोलापुरचा पोपट अशा पद्धतीचा उल्लेख केला. परंतु पोपट हा मिठू मिठू बोलतो आणि कावळा हा कावकाव करतो. त्यामुले त्यांनी जी कावकाव केलेली आहे. त्याकडे आम्ही दुलर्क्ष करतो. पोपट ज्यावेळी बोलतो त्यावेळी लोकांना ऐकावं वाटतं परंतु कावळा कावकाव करतो.तेव्हा त्याला हाकलून द्याव वाटतं. त्यांनी केलेली कावकाव ही लोकांनी फारशी घेतली नाही. पुन्हा अशी कावकाव केली तर लोक मात्र काठी घेऊन त्यांच्यामागे लागतील असा टोला उमेश पाटील यांनी भगिरथ भालके यांना लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भीम आर्मीचे प्रमुखांवर जीवघेणा हल्ला, अज्ञात व्यक्तींकडून चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीवर
हेही वाचा…“४० हजार कोटी रूपयांची गुंतवणुक, १ लाख २० हजार रोजगार निर्मिती,” शिंदेंनी एका झटक्यात विरोधकांची हवा टाईट केली
हेही वाचा…“संभाजी भिडेंना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा,” छगन भुजबळांची मागणी
हेही वाचा…बोले तैसा चाले..! “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोडगोळीची कमाल…!”, भाजप नेत्यानी केलं कौतुक
हेही वाचा…“मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे अनेक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला”, खडसेंचा फडणवीसांवर आरोप