मुंबई : सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे पुन्हा वादात सापडले आहेत. १५ आँगस्ट या स्वातंत्र्य दिनाबाबत भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे अनेक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला”, खडसेंचा फडणवीसांवर आरोप
“खरे म्हणजे मनोहर भिडे त्यांना देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करायला पाहिजे. कारण त्यांनी शाळेतील 15 ऑगस्ट आमचा स्वातंत्र्य दिन नाही. आपला लोकप्रिय असलेला तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज नाही आणि पुढे त्यांनी असं म्हटलं की, आपलं जे राष्ट्रगीत आहे. जन गण मन राष्ट्रगीत सुद्धा नाही. असा एवढं जर दुसरा कोणी म्हटलं असतं तर आतापर्यंत त्यांना ताबडतोब देशद्रोहाच्या गुण्याखाली अटक केली असते. संभाजी नाव स्वतःला लावायचं आणि बहुजन समाजाच्या पोरांना फितवायचं काम चाललंय. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
हेही वाचा…“राज्यातील साडेबारा कोटी जनतेला ५ लाखांचा आरोग्य विमा”, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वयानुसार त्यांचा समतोल ढासळला आहे. संपूर्ण देशांमध्ये मुर्खात काढत असताना तरंग्याला अपमानित करत असताना स्वातंत्र्य दिनाला मान्य करत असताना स्वातंत्र्य सैनिकांना आपण करत असताना त्यांच्यावरती कुठलाही पुन्हा दाखल होत नाही. त्याच्या मनामध्ये प्रचंड जातीयवाद, प्रचंड धर्मद्वेष भरलेला आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर भिडेंना काय कर्णाने दान केलेलं कर्ण कवच सापडलं आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अशी पुन्हा कावकाव केली तर..” राष्ट्रवादीकडून भगिरश भालकेंचा जोरदार समाचार
हेही वाचा…भीम आर्मीचे प्रमुखांवर जीवघेणा हल्ला, अज्ञात व्यक्तींकडून चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीवर
हेही वाचा…“४० हजार कोटी रूपयांची गुंतवणुक, १ लाख २० हजार रोजगार निर्मिती,” शिंदेंनी एका झटक्यात विरोधकांची हवा टाईट केली
हेही वाचा…“संभाजी भिडेंना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा,” छगन भुजबळांची मागणी
हेही वाचा…बोले तैसा चाले..! “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोडगोळीची कमाल…!”, भाजप नेत्यानी केलं कौतुक