मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने कर्नाटक, गोवा आणि राज्याच्या प.किनारपला मोठा तडाखा दिल्यानंतर, अखेर ते गुजरातला जाऊन धडकले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला असून, फडणवीस यांनी दौरा काढण्यासाठी ई-पास काढलाय का, अशी प्रश्न विचारणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्त्याने दाखल केली असल्याची माहिती आहे.
रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी, रविवारी अचानक कोपरगावचा दौरा केला. यावेळी त्यांनी, भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. या भेटीवेळी महामारी संबंधीच्या नियमांचा भंग झाल्याची तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी या याचिकेत केली आहे. त्याअनुषंगाने त्यांनी मुख्य सचिवांकडे, माहितीच्या अधिकारात त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
📍Vave village, Raigad.
Houses have collapsed too. So, a problem regarding shelter too has arisen here due to #CycloneTaukte.
वावे येथे घर कोसळले आहे. त्यामुळे लोकांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या भेट घेऊन त्यांच्याशीही संवाद साधला. pic.twitter.com/03aiwt7rvF— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2021
दरम्यान, या भेटीवेळी सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. फडणवीसांच्या भेटीचा हा कार्यक्रम कोविड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिथे महामारीने बाधित रुग्ण देखील होते. त्यामुळे फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी इतके लोक एकत्र येण्यास परवानगी दिली होती का? यासंबंधी पोलीस, तालुका किंवा जिल्हा प्रशासनाने कारवाई केली असल्यास, त्याचा तपशील मिळावा, अशी माहिती देखील काळे यांनी मागविली असून, सोबत कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि छायाचित्रेही पाठविली आहेत.
Read Also :
- शिवसेना खासदार म्हणाला, ‘ नरेंद्र मोदी दिलदार पंतप्रधान’
- ‘ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ईडी म्हणजे…’
- ‘साहेबांच्या पत्रानंतर फोनाफोनी झाली आणि खतांची किंमत झटक्यात खाली आली’
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल…’
- मी छत्रपतींचा वंशज, आदोलन काय असते हे मला शिकवू नये – संभाजीराजे भोसले