मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दीव आणि गुजरातमध्ये, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी केली. यांनतर त्यांनी गुजरातला १००० कोटींची नुकसानीच्या भरपाईसाठीची मदत देऊ केली.
दरम्यान, यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना, “आपल्या देशाचे पंतप्रधान हे दिलदार आहेत. त्यांचे संपूर्ण देशावर लक्ष असते. त्यामुळे ते राज्यलादेखील चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी १५०० कोटींची रुपयांची मदत जाहीर करतील”, असे म्हटले आहे.
तसेच, “पंतप्रधानांनी गुजरातला तातडीने मदत देऊ केली. आम्हाला त्याविषयी दु:ख मानण्याचे काहीच कारण नाही. मात्र, कधीतरी त्यांचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा मी धरतो. त्यांनी महाराष्ट्र सोबतच गोव्याला देखील ५०० कोटींची मदत देऊ करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीसांच्या कोकण दौऱ्याचा संदर्भ घेऊन, “देवेंद्र फडणवीस देखील आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत. ते केंद्रातल्या त्यांच्याच पक्षाच्या सरकारला, कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती देतीलच”, असं म्हणत टोला लगावला.
Read Also :
- ‘ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ईडी म्हणजे…’
- ‘साहेबांच्या पत्रानंतर फोनाफोनी झाली आणि खतांची किंमत झटक्यात खाली आली’
- मी छत्रपतींचा वंशज, आदोलन काय असते हे मला शिकवू नये – संभाजीराजे भोसले
- ‘या वर्षाअखेरपर्यंत सर्व प्रौढांचं लसीकरण करणार’
- मोदी सरकारचा मोठा निर्णय, विरोधानंतर आता जुन्याच दरात खत उपलब्ध करणार