पुणे : महामारीमुळे हातावर पोट असणाऱ्या आणि रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या सर्व सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन करताना दिलासा आणि मदत म्हणून अनेक योजना जाहीर केल्या होत्या. त्यापैकी रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची घोषणा देखील ठाकरे सरकारकडून करण्यात आली होती.
मात्र, योजनांची घोषणा होऊन अनेक दिवस उलटले तरीही, अजूनही रिक्षाचालकांना अर्थसहाय्य मिळाले नसल्याने, आज पुण्यातल्या आरटीओ कार्यालयाच्या पायर्यांवर, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच, शहरातील इतर संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते.
या आंदोलनदरम्यान, गिरीश बापट यांच्यामागे आंदोलनासाठी एक आंदोलनकर्ता बसला होता. यावेळी एक कार्यकर्ता बापट साहेबांना म्हणाला, “तुमच्या मागे ईडी बसला आहे”, (त्या माणसाचे खाजगीतले नाव) हे ऐकताच गिरीश बापट त्या कार्यकर्त्याला म्हणाले, “अशा ईडी-फिडींना मी घाबरत नाही. आत्तापर्यंत अशी कितीतरी आंदोलनं केली, आणि आलीच जर ईडी तर ईडीला येऊन मिळणार काय आहे? आमच्या खिशात तर चणे, फुटाणे आणि शेंगदाणेच असतात”, त्यांनी असं म्हणताच उपस्थित आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार हशा पिकला.
तसेच ते म्हणाले, “ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ईडी म्हणजे आमचा रिक्षाचालक. सरकारने या घटकाला लवकरात लवकर मदत द्यावी,” अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
Read Also :
- ‘साहेबांच्या पत्रानंतर फोनाफोनी झाली आणि खतांची किंमत झटक्यात खाली आली’
- मोदी सरकारचा मोठा निर्णय, विरोधानंतर आता जुन्याच दरात खत उपलब्ध करणार
- ‘नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत’
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल…’
- ‘गुजरातचा PM गुजरातच्या दौऱ्यावर…बाकीची राज्य वाऱ्यावर!’