नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात रासायनिक खतांचा किमती वाढल्या होत्या. यावरून मोठी विरोध पाहायला मिळत होता. आता विरोधानंतर केंद्र सरकारने जुन्याच दरात खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने खतांवरील अनुदानात वाढ केल्याने आता खत जुन्याच किंमतीत मिळतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. सरकार शेतकऱ्यांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढलेल्या असतानाही सरकारनं शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या निर्णयानंतर DAP खताचे एक पोते 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांनाच मिळणार आहे, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
डीएपी म्हणजेच डाय-अमोनियम फॉस्फेट खतांवरील अनुदानात 140% वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना डीएपीच्या प्रत्येक पिशवीसाठी 500 रुपयांऐवजी 1200 रुपये अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना डीएपीची पिशवी 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळेल. या अनुदानापोटी सरकार 14,775 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. यानंतर गौडा यांनी यासंदर्भात फोन करून आश्वासन देखील दिले होते. आता अखेर सरकारने जुन्याच दरात खत उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.
Read Also :
- ‘नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत’
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल…’
- शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राची दखल, थेट केंद्रीय मंत्र्याने फोन करत दिले आश्वासन
- राजीव सातव यांना श्रद्धांजली सभेचं आयोजन, काँग्रेस नेते झाले भावूक
- ‘गुजरातचा PM गुजरातच्या दौऱ्यावर…बाकीची राज्य वाऱ्यावर!’