मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं आहे. उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, असे आव्हान दिले आहे.
जर देशात लोकसभेच्या निवडणुका उद्या घेतल्या, तर मोदी 400 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर बोलताना नाना पटोलेंनी भाजपला आव्हान दिले.
नाना पटोले म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत, याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असे नाना पटोले म्हणाले.
Read Also :
- शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राची दखल, थेट केंद्रीय मंत्र्याने फोन करत दिले आश्वासन
- राजीव सातव यांना श्रद्धांजली सभेचं आयोजन, काँग्रेस नेते झाले भावूक
- ‘गुजरातचा PM गुजरातच्या दौऱ्यावर…बाकीची राज्य वाऱ्यावर!’
- ‘युट्यूबकडून मिळतात ‘इतके’ पैसे’, गडकरींनी सांगितला आकडा
- ‘बार्जमधील निष्पापांच्या मृत्यूला ONGC प्रशासन जबाबदार’