मुंबई : कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही गोष्टीला परवानगी नाही. अशात स्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत, असा जोरदार टोला भातखळकर यांनी मलिकांना लगावला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मलिक यांनी 2014 साली आपल्या पत्नी आणि मुलाच्या नावे खरेदी केलेल्या उस्मानाबाद येथील जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत आहे. यासंदर्भात भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत. pic.twitter.com/5I8XZuFFOW
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 20, 2021
यावरून आता अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
Read Also :
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल…’
- शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राची दखल, थेट केंद्रीय मंत्र्याने फोन करत दिले आश्वासन
- राजीव सातव यांना श्रद्धांजली सभेचं आयोजन, काँग्रेस नेते झाले भावूक
- ‘गुजरातचा PM गुजरातच्या दौऱ्यावर…बाकीची राज्य वाऱ्यावर!’
- ‘युट्यूबकडून मिळतात ‘इतके’ पैसे’, गडकरींनी सांगितला आकडा