मुंबई : महामारीच्या व्यवस्थापन आणि नियोजनावरून आधीच केंद्र सरकार टीकेचे धनी झालेले असताना, आता केंद्र सरकारवर रासायनिक आणि मिश्र खतांच्या दर वाढीच्या निर्णयावरून हल्लबोल केला जात आहे.
राज्यातील अनेक नेत्यांनी यासंदर्भात आपली भूमिका थेट संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवली असून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत थेट केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून, केंद्र सरकारने वाढवलेले रासायनिक खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी केली होती.
यावर आज मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत, डीएपी खतांच्या किंमतीवरील सब्सिडी १४० टक्क्यांनी वाढवली असून, आता डीएपी खताची एक बॅग शेतकऱ्यांना जुन्याच किंमतींना मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी, ‘शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुधारण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, त्यामुळे खतांच्या किमतींमध्ये जागतिक वाढ होऊन देखील सरकार देशातील शेतकऱ्यांना खते जुन्याच दराने उपलब्ध करून देत आहे”, असे सांगितले.
रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावे, केंद्रीय खत व रसायन मंत्री श्री. डी. व्ही. सदानंद गौडा यांना या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घ्यावी अशी विनंती आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी मंगळवारी एका पत्राद्वारे मंत्रीमहोदयांना केली.
— NCP (@NCPspeaks) May 19, 2021
दरम्यान, पवार यांच्या पत्राची केंद्रीय मंत्री गौडा यांनी दखल घेत, थेट त्यांच्याशी वाढलेल्या खतांच्या किंमतीसंदर्भात फोनवरून चर्चा केली होती. तसेच, येत्या दोन दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासनही दिले होते. यांनतर, एकाच दिवसात खतांच्या किंमती कमी करण्यात आल्या. याबाबतची अधिक माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पवार “पॉवर”ची चर्चा राजकीय वर्तुळात आणि जनमानसामध्ये सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Read Also :
- “मुंबईत गेल्यावर शिवसेनेचे आणि सोलापुरात आल्यावर मोहितेंचे असणारे नारायण आबा पाटील आमच्यावर टीका करत आहेत” आमदार संजय शिंदे कडाडले*
- मी छत्रपतींचा वंशज, आदोलन काय असते हे मला शिकवू नये – संभाजीराजे भोसले
- कुकडीच्याही पाण्यात मशाल पेटली, न्यायालयीन लढ्यासाठी कुकडी संघर्ष समिती स्थापन
- ‘या वर्षाअखेरपर्यंत सर्व प्रौढांचं लसीकरण करणार’
- मोदी सरकारचा मोठा निर्णय, विरोधानंतर आता जुन्याच दरात खत उपलब्ध करणार