मुंबई : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काॅंग्रेस पक्षाने सपाटून मार खालला आहे. पंजाबमधील असलेली सत्ता देखील काॅंग्रेस पक्षाने गमावली आहे. त्यामुळे काॅंग्रेस नेतृत्वाबद्दल अनेक नेत्यांनी शंका व्यक्त करत नाराजी देखील व्यक्त केली आहे. अशातच आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा काॅंग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी काॅंग्रेसचं नेतृत्वापासून गांधी घराण्यांनी आपोआप बाजूला व्हावं असंही सांगितलं आहे.
मागच्या वर्षी म्हणजे 2020 ला देखील काॅंग्रेसच्या जी-20 गटाने काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना काॅंग्रेस नेतृत्वाबाबत पत्र लिहिलं होतं. सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी कपिल सिब्बल यांचं नाव देखील होतं. मी सर्वांच्या वतीने बोलू शकत नाही. परंतु मी माझं वैयक्तिक मतं मांडलं आहे. काहींना घर का काॅंग्रेस असा पक्ष हवा आहे. परंतु मला सब की काॅंग्रेस असं हवं आहे. सब की काॅंग्रेस याचा अर्थ फक्त असा होत नाही की, सर्वांनी एकत्र येणे. पंरतु त्याचा अर्थ असा होतोय की, देशात ज्यांना भाजप नको आहे, अशा लोकांनी एकत्र येणे होय.
महाराष्ट्रात देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वाबाबत शंका उपस्थित केलं जात आहे. तसेच काॅंग्रेस नेते राज्यातील नेतृत्वाबाबत नाराज असल्याचंही चित्र सध्या दिसत आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पद भुषवलेले अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण सध्या काॅंग्रेसच्या मोठ मोठ्या कार्यक्रमातून दुर जात असल्याचं दिसत आहे. तसेच काॅंग्रेस युवा नेतृत्व कुठं हरवलंय, असा सवाल देखील सामान्य नागरिकांकडून केला जात आहे.
चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डावर नियुक्त केलीत! देवेंद्र फडणवीसांनी सादर केला दुसरा पेन ड्राईव्ह
महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेस सध्या सत्तेत आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काॅंग्रेसचाच मुख्यमंत्री असल्याचा दावा काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच पुणे, ठाणे, मुंबई आणि नाशिक या प्रमुख शहरात येत्या काही महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच देशात लोकसभेच्या देखील निवडणुका आहेत. त्यामुळे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल बघता आणि महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काॅंग्रेस कशाप्रकारे कामगिरी करतोय. ते पहाणं आता महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- नवाब मलिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
- ईडीच्या कारवाई प्रकरणी नवाब मलिकांना उच्च न्यायालयचा झटका ; याचिका फेटाळल्याने मलिक अडचणीत
- प्रवीण देरकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! मुंबै जिल्हा बॅंक निवडणुक प्रकरणी गुन्हा दाखल
- पुण्यात इच्छुकांच्या भाऊ-गर्दीचा लाखोंचा खर्च पाण्यात; प्रभाग रचना रद्द झाल्याने भावी नगरसेवक हवालदिल
- ” खासदार सुजय हा अत्यंत नम्र अन् विनयशील “; खासदार सुजय विखेंबद्दल बाळा नांदगावकरांचे आपुलकीचे बोल