मुंबई : दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांना वक्फ बोर्डावर नियुक्त केल्याचा आरोप करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा बॉम्ब फोडला. यासंबंधीत त्यांनी पेन ड्राईव्ह देखील विधानसभेत सादर केला आहे. यात देवेंद्र फडणवीस यांनी मोहम्मद हर्षद खान डॉक्टर मुदीस्सर लांबे यांचं नाव घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधानांबद्दल बोललं की लगेच देशद्रोहाचा गुन्हा, मग मुख्यमंत्र्यांनावर देखील बोलू नये; उदय सामंत
दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की, वक्फ बोर्डावर डॉ. मुदीस्सर लांबे या व्यक्तीची नियुक्ती सरकारने केली नाही. याबाबतची निवडणुक 30 ऑगस्ट 2019 ला पार पडली होती. त्या निवडणुकीत ते निवडून आलेले सदस्य आहेत. त्यामुळे विनाकारण दाऊद दाऊद करून उगाचच गोंधळ घालू नका. तसेच यासंबंधीत ते दाऊदशी संबंधित असतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. असंही ते म्हणालेत.
योगी महाराजांनी देशाचं वाटोळ केलंय, त्यांची जागा मठातच! प्रणीती शिंदे यांची सडाडून टीका
या पेन ड्राईव्हमध्ये मोहम्मद हर्षद खान आणि मुददशीर लांबे अशी दोन पात्रे आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमणुक केली होती. 31 डिंसेबर 2020 ला तांबे यांच्याविरोधात एका 33 वर्षी एका सामाजिक कार्यकर्त्यींनी बलात्काराची केस दाखल केली होती. त्या तक्रारीत त्यांनी असं म्हटलं आहे की, तेव्हा मी तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी तांबेनी मला लग्न करण्याचा आश्वासन दिलं होतं. त्यानंतर गंभीर परीणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील दिली होती. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
नोटीस आम्हालाही येतात परंतु आम्ही तमाशा केला नाही! संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला
दरम्यान, वक्फ बोर्डावर नियुक्त केलेल्या लांबे यांनी आपला विस्तुत परिचय दिला आहे. त्यासंबंधीत ऑडिओ आणि व्हिडीओ पेन ड्राईव्ह मी विधानसभा उपाध्यक्षाकडे दिला आहे. यात लांबे यांचा हर्षद मोहम्मद खान यांच्याशी झालेला संवाद आहे. यामध्ये वक्ब बोर्डात कशी कमाई करायची यासंदर्भात देखील उल्लेख केला आहे. त्यातील संवाद देखील देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखवला आहे. हर्षद खानला तुरूंगात टाकलं आहे. तो मोबाईल देखील त्यांच्या ताब्यात आहे. तो मोबाईल पहिल्यांदा ताब्यात घ्या. चक्क दाऊदची माणसं आपण वक्ब बोर्डात नियुक्त केलीत. अर्थसंकल्पावर बोलत असताना विकास कमी होईल जास्त होईल. एकीकडे सरकार चार गोष्टी कमी करणार जास्त करणार ते आपण पाहुन घेऊ, पंरतु या राज्यात ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले अशा दाऊद संबंध ज्यांचे रिश्ते आहेत. अशा लोकांना जर सरकार पाठीशी राखत असेल तर राज्याचं कुणीचं भलं करू शकत नाही. आता तरी जागे व्हा.
Read also:
- चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डावर नियुक्त केलीत! देवेंद्र फडणवीसांनी सादर केला दुसरा पेन ड्राईव्ह
- विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी फोडला दुसरा राजकीय बॉम्ब! राज्यात एकच खळबळ
- पुढचा मुख्यमंत्री काॅंग्रेसचाच असणार! नाना पटोलेंच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
- आता तुमचा भ्रष्टाचार काढला तर गुन्हेगार करायला निघाला का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
- इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरूंगात ठेवले! आम्ही घाबरणारे नाहीत; देवेंद्र फडणवीस