मुंबई : अलिकडेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. उत्तराखंड, मणिपुर, गोवा आणि उत्तरप्रदेश मध्ये भाजपने सत्ता कायम राखली आहे. तर काॅंग्रेसकडून पंजाबची सत्ता निसटून गेली आहे. यात चारही राज्यांत काॅंग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. अशातच पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्री हा काॅंग्रेसेच होणार आहे, असं वक्तव्य काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात एकच चर्चा सुरू झाली.
” सत्य बाहेर आण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची नार्को टेस्ट करा”; विखे पाटलांची सरकारला मागणी
नाना पटोले यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसेच सर्वाधिक उमेदवार जिंकणार आहे. तसेच पुढचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचाच असणार आहे . गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध मुद्दांवरून राजकीय वातावरण पेटलंल असल्याने नाना पटोले यांनी केलेले हे वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरला आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रात सत्तेचा दुरूपयोग करून भाजपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण चालविले जात आहे. काॅंग्रेससह सर्व विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी लावायची आणि विरोधकांना जेरीला आणायचे हीच मोदी सरकाची सुडभावनेची कार्यसंस्कृती राहिली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. जे विरोधक शरण येणार नाहीत. त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावायचा आणि तरीही विरोधक शरण येत नसतील तर त्यांच्या ताब्यातील राज्य सरकार पाडण्याचे कटकारस्थान रचण्यात येते असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय कायद्यापेक्षा मोठे आहेत काय संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण वेगळ्याच वळणावर गेलं आहे. दिवसेंदिवस भाजप विरूद्ध महाविकास आघाडीमधील राजकीय संघर्ष वाढत चालला आहे. अशातच लवकरच सरकार पडणार असल्याचं वक्तव्य देखील केलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.
Read also:
- आता तुमचा भ्रष्टाचार काढला तर गुन्हेगार करायला निघाला का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
- इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरूंगात ठेवले! आम्ही घाबरणारे नाहीत; देवेंद्र फडणवीस
- पंतप्रधानांबद्दल बोललं की लगेच देशद्रोहाचा गुन्हा, मग मुख्यमंत्र्यांनावर देखील बोलू नये; उदय सामंत
- योगी महाराजांनी देशाचं वाटोळ केलंय, त्यांची जागा मठातच! प्रणीती शिंदे यांची सडाडून टीका
- नोटीस आम्हालाही येतात परंतु आम्ही तमाशा केला नाही! संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला