कोल्हापूर : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर राज्यात नवा वाद निर्माण झाला. त्यांनी केलेल्या वक्तव्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच जागोजागी राज्यपालांच्या या वक्तव्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
” अन अजित पवारांनी भाषण थांबवलं..” ; अजित दादांच्या सर्वधर्म समभावाची अख्या पुण्यात चर्चा
राज्यपाल हे घटनात्मक पद असून त्यांच्या निषेधाचा ठराव विद्यापीठांत होऊ नये , अशी आम्ही भूमिका घेतली आहे. त्यासंबंधीत आम्ही विद्यापीठांना सूचना देखील केल्या आहेत. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणी बोलले तर लगेचच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच राज्याचे मुख्यमंत्र्यांबद्दलही असं बोलू नये. असा समजही देखील उदय सामंत यांनी दिला आहे.
फडणवींसाना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही; दंगा करण्याची काय गरज दिलीप वळसे पाटील
गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवें यांनी शेतकऱ्यांबद्दल काय बोलले होते, हे सर्वांंना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांचा पुन्हा खुलासा देणे योग्य नाही. पंरतु कोणीही कोणत्याही नेत्यांवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले, तसेच प्राध्याधक भरतीचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला असुन प्राध्यापक भरती सुरू आहे. त्याचबरोबर त्यांनी ऑनलाईन ऑफलाईन परिक्षा संदर्भात देखील त्यांनी योग्य ती भूमिका घेतली असल्याचं म्हटलं आहे.
राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस
राज्यपाल भगतसिहं कोश्यारी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात बराच वाद निर्माण झाला होता. याच पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशानात देखील पडले होते.
Read also:
- योगी महाराजांनी देशाचं वाटोळ केलंय, त्यांची जागा मठातच! प्रणीती शिंदे यांची सडाडून टीका
- नोटीस आम्हालाही येतात परंतु आम्ही तमाशा केला नाही! संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला
- ” सत्य बाहेर आण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची नार्को टेस्ट करा”; विखे पाटलांची सरकारला मागणी
- “मुख्यमंत्री महोदय, तिचा पूजा चव्हाण होऊ देऊ नका “; रघुनाथ कुचिकवर कारवाईसाठी चित्रा वाघ यांची आर्त हाक
- देवेंद्र फडणवीस काय कायद्यापेक्षा मोठे आहेत काय संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका