मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत समीर वानखडे यांच्या धर्माबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर रामदास आठवले आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष यांच्या आणि वानखेडे परिवाराच्या भेटीवरही आक्षेप नोंदवला आहे. त्याचबरोबर संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती क्लीन चिट कशी काय देऊ शकते असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांना कागदपत्र तपासण्याचा अधिकार नाही असे सांगत त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. आणि याच अनुषंगाने या साऱ्या घटनेबद्दल राष्टपतींकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पापांचे ओझे डोक्यावर घेऊ नका – भाजप
त्याचबरोबर काल झालेल्या आठवलेंच्या पत्रकार परिषदेवर उत्तर देताना त्यांनी मी कधीच त्यांच्या पत्नीवर आणि मुलांवर कधीच टीका केले नसल्याचे सांगितले आहे. नवाब मालिकांनी भाजपचे एक नेते जयदीप राणा हे ड्रगच्या तस्करीबद्दल जेलमध्ये आहेत आणि त्याचे संबंध थेट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. फडणवीसांच्या कळात त्यांच्या अमृता फडणवीस यांनी नद्यांवर एक गाणे काढलेहोते ज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिसले होते आणि याच गाण्यावर मालिकांनी आक्षेप घेत जयदीप राणा हे या गाण्याचे स्पॉन्सर होते असा हल्लाबोल नवाब मालिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. तसेच जयदीप राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळचे संबंध असल्याचे देखील त्यांनी केला आहे.
Yesterday, Chairman of the National Scheduled Castes Commission &BJP's, Arun Haldar visited Sameer Wankhede's residence & him a clean chit. He should have conducted an investigation first & submitted a detailed report. We will complain about him to the President: Nawab Malik, NCP pic.twitter.com/oU1O8yDWL3
— ANI (@ANI) November 1, 2021
मुंबईत ड्रग्सचा धंदा करता यावा यासाठीच समीर वानखडे यांना मुंबईत आणण्यात देखील देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात होता आणि यासोबतच मुंबई आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ड्रग्सचा धंदा चालू आहे असा खळबळजनक आरोप मालिकांनी केला आहे.
दरम्यान मी प्रसिद्ध केलेलं समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट खरं आहे त्यांच्या वडिलांचं नाव दाऊदचं, आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे असा पुर्नउच्चार देखील त्यांनी केला आहे त्याचबरोबर हे कागद मिळवण्यासाठी मी दीड महिने घातले असल्याच देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.वानखेडे यांनी खोटे कागदपत्र दाखवत नौकरी मिळवली आहे, आणि अशी नोकरी मिळवत त्यांनी एका दलिताचा हक्क हिसकावला असा आरोप देखील त्यांनी केला आहे.तसेच जयदीप राणा आणि फडणवीस यांच्यात जवळचे संबंध असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
Read Also :
- संकटातग्रस्त शेतकऱ्यांची ठाकरे सरकार पोपटपंची करतयं, १ नोव्हेंबरला काळी फीत लावून आंदोलन – चंद्रकांत पाटील
- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे तुम्ही जाण ठेवा : माजी उपसंरपंच अमोल शिवले
- दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार – किरीट सोमय्या
- समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत – रामदास आठवले
- ‘मुळा’मधील वरिष्ठांच्या त्रासामुळे तरुणाचा गळफास; आत्महत्येमागे अहमदनगरच्या शिवसेना मंत्र्याचा हात?