नवी दिल्ली : काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता जम्मू काश्मीर मध्ये पोहचली आहे. भारत जोडो यात्रेला आतापर्यंत 130 पेक्षा अधिक दिवस झाले असून काही दिवसात ही यात्रा पुर्ण होणार आहे. यातच या यात्रेत आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सहभाग घेतला असून राहुल गांधी यांच्यासोबत राऊत पायीही चालले. त्यावरून आता मुंबई भाजपचे शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी राऊतांवर टिका केलीय.
“संरपचं पदापासून सगळ्याचं निवडणुकांसाठी मोदींची धावपळ, मला त्यांची काळजी वाटते;” सुप्रिया सुळे
हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते. 370 कलम मुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्य जण संघर्ष करीत होतो. बलिदान देत होते. तेव्हा संजय राऊत मुंबईत बसून मीडियात ध्वनी प्रदूषण करीत होते. देव देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले संजय राऊत काॅंग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले. याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार, गेले, पक्षाची शकले उडाली. याच भल्या कामचा झेंडा तुम्ही घेऊन निघालाच आहात. तर तु चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची. असं म्हणत शेलारांनी राऊतांवर टिका केलीय.
शुंभागी पाटलांना आघाडीचा पाठिंबा जाहीर, तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काॅंग्रेसमधून निलंबित
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत याआधी शिवसेनेचे अनेक नेते सहभागी झाले. महाराष्ट्रात आदित्य ठाकरे यांनी देखील भारत जोडा यात्रेत सहभाग घेतला. तर उत्तरेकडे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेधी यांनीही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत पायी चालल्या होत्या. यातच आता भारत जोडो यात्रेचा येत्या काही दिवसात शेवट होणार आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेनंतर पुढे काय ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
◆हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा मा. संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते
◆ 370 कलम मुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्य जण संघर्ष करीत होते,बलिदान देत होते, तेव्हा खा. संजय राऊत मुंबईत बसून मिडियात “ध्वनी प्रदूषण” करीत होते
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 20, 2023
Read also
- मुंबई महापालिका निवडणुक…! भाजप-शिंदेंच्या ट्रिपल इंजिनचा डाव ठाकरे गट रोखणार का?
- कसब्यातील पोटनिवडणुक गाजणार..! काॅंग्रेस अन् भाजपमध्ये जोरदार लढत ?
- “मोदींचं भाषणं ऐकून मिठी नदीही हसली असेल अन् खारा समुद्रही गोड झाला;” राष्ट्रवादीने डिवचलं
- “BMC ची 3 हजार कोटीची एफडी शिंदे फडणवीसांनी मोडली, मोदींना तशी परिस्थिती करायचीय का?”
- मोदींचा मुंबई दौरा..! बीकेसीच्या भाषणांतून मोदींनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले