मुंबई : मागील काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार सुरू आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरात मुक मोर्चे देखील काढण्यात आले. त्यावर तोडगा म्हणून मराठा समाजासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सारथीच्या नवीन कार्यालयाचं नाशिक येथे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी शिंदेंनी याबाबत भाष्य केलं आहे.
“माझी 80 वर्षाची आई, म्हणाली…शिवसेनेत जा.. उद्धव साहेबांना तुझी गरज आहे”; संजय देशमुख
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजी राजे छत्रपती आझाद मैदानावर बसले होते. तेव्हा सर्वांचीच धावपळ उडाली आणि अशात आव्हान अंगावर घेण्याची वेळ आल्यामुळे मला पुढे करण्यात आले. परिस्थिती अंगावर घेण्याची वेळ आली की नेहमी मलाच पुढे केले जात होते. अशीच आव्हाने अंगावर घेण्याच्या धाडसामुळे राज्यात नवीन सरकार आले, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
“संजय राऊतांची दिवाळीही तुरुंगातच”; न्यायालयाने आणखी वाढवली कोठडी
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. राज्याचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे. राज्याचे प्राधान्यक्रम, शिक्षण, आरोग्य, कृषी, शेतकरी विकासाला असल्याचे नमुद करतानाचा राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी आणि मराठा कुणबी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सारथीचे काम सुरू आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- “मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
- केंद्रीय तपास यंत्रणांच्या जीवावर भाजप अजून किती काळ सत्ता भोगणार?
- “संजय राऊत अन् अनिल देशमुखांची दिवाळी तुरूंगातच”; अद्यापही दिलासा नाहीच
- “मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे अन् उद्याही राहिल”
- “ज्यांना कुळव, कुदळ, दांडा कळत नाही, त्यांना शेतीचं काय कळणार”; सुषमा अंधारे