मुंबई : राज्यभरातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रयत्न करण्यात आले. मात्र काही ठिकाणी लोकशाहीसाठी धोकादायक ठरेल अशारितीने थेट सरंपचपदाचा लिलावच करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
सरंपच व सदस्य पदांचा लिलाव करणाऱ्या अशा ग्रामपंचायतींना राज्य निवडणूक आयोगाने दणका दिला असून, येथील निवडणूका रद्द करण्यात आल्या आहेत.
उमराणे (ता. देवळा, जि.नाशिक) आणि खोंडामळी (ता.जि. नंदुरबार ) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्य पदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त. त्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द- राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची घोषणा pic.twitter.com/coVjmkiByx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 13, 2021
निवडणूक आयोगाने सरपंच आणि सदस्यपदांसाठी बोली लावणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी या गावातील ग्रामपंचायत निवडणूक रद्द केली आहे. जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
या प्रकरणी अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
Read Also :
- ‘राष्ट्राध्यक्ष कायद्यापेक्षा मोठा नाही’, ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव
- ‘30 वर्षांपूर्वी टेस्लाने महाराष्ट्राचा विचार केला असता, पण आता…’
- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभाविपच्यावतीने ‘कोरोना योद्धा समर्पित’ बाईक रैली संपन्न
- ‘मलिक यांच्यावर ‘ड्रग माफिया’ असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आलीये’, भाजप आमदाराची टीका
- ‘घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवताय’, भातखळकरांचा नवाब मलिक यांना टोला