मुंबई : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची अखेर भारतात एंट्री झाली आहे. मात्र अनेक ऑटोमोबाईल कंपन्या असलेल्या महाराष्ट्राऐवजी टेस्लाने कर्नाटकची निवड केल्याने सरकारवर निशाणा साधला आहे.
30 वर्षांपूर्वी टेस्लाने महाराष्ट्राचा विचार केला असता, मात्र आता त्यांनी कर्नाटकचा विचार केला आहे. आपण सर्वांनी गंभीर होत ह्याचा विचार केला पाहिजे, असे मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी म्हटले आहे.
सुमारे तीस वर्षांपूर्वी टेस्लासारख्या कंपनीला देशात कार्यालय, संशोधन केंद्र सुरू करायचं असतं तर त्यांनी प्राधान्यानं महाराष्ट्राचा विचार केला असता. आज महाराष्ट्रानं प्रयत्न करूनही त्यांनी कर्नाटकचा विचार केला.. आपण सर्वांनी गंभीर होत ह्याचा विचार केला पाहिजे..
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) January 13, 2021
अनिल शिदोरे ट्विट करत म्हणाले की, सुमारे तीस वर्षांपूर्वी टेस्लासारख्या कंपनीला देशात कार्यालय, संशोधन केंद्र सुरू करायचं असतं तर त्यांनी प्राधान्यानं महाराष्ट्राचा विचार केला असता. आज महाराष्ट्रानं प्रयत्न करूनही त्यांनी कर्नाटकचा विचार केला. आपण सर्वांनी गंभीर होत ह्याचा विचार केला पाहिजे.
टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज 3 मंत्र्यांना झटका" बोलाची कढी बोलाचा भात" pic.twitter.com/tvtD9CJLXT
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 13, 2021
याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील टेस्लाने महाराष्ट्राऐवजी कर्नाटकची निवड केल्याने राज्य सरकार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरेंचा पेज 3 मंत्री असा उल्लेख करत त्यांनी टीका केली होती.
दरम्यान, कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने भारतात रजिस्ट्रेशन केलं आहे. कंपनी बंगळुरूमधून आपल्या व्यवसायास सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे टेस्लाने महाराष्ट्रातून सुरुवात करावी यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र टेस्लाने कर्नाटकची निवड केली.
Read Also :
- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभाविपच्यावतीने ‘कोरोना योद्धा समर्पित’ बाईक रैली संपन्न
- ‘मलिक यांच्यावर ‘ड्रग माफिया’ असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आलीये’, भाजप आमदाराची टीका
- ‘घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवताय’, भातखळकरांचा नवाब मलिक यांना टोला
- … तर उद्धव ठाकरे आणि पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा- चंद्रकांत पाटील
- शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहणार, राहुल गांधींचा इशारा