मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक झटके बसत असल्याचे दिसत आहे. आधीच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखीन एक धक्का बसला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
एकीकडे विरोधी पक्ष भाजप धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, तर आता नवाब मलिक यांच्या जावयावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर भाजपकडे टीका करण्यासाठी आयते कोलित मिळाले आहे.
नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का? असा उपरोधिक सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मलिक यांच्या जावयाला अटक करण्यात आल्यानंतर केला आहे.
नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 13, 2021
अतुल भातखळकर यांनी ट्विट केले की, हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का?
दरम्यान, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले होते. मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत.
Read Also :
- … तर उद्धव ठाकरे आणि पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा- चंद्रकांत पाटील
- शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहणार, राहुल गांधींचा इशारा
- ‘टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका’, संदीप देशपाडेंचा आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
- न्यायालयाची शेतकरी कायद्यांना स्थगिती, मात्र लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील
- ‘धनंजय मुंडेंचा त्वरित राजीनामा घ्या, अन्यथा…’, भाजप आक्रमक