मुंबई : मागील काही दिवसापासून राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यातच शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर शरद पवारांना अजित पवारांबाबत वारंवार प्रश्न विचारण्यात आले. याच प्रश्नावंर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा…“शिंदेंना बाजूला ढकलून फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर, त्याची चिंता शिंदेंसह चाळीसवीरांनीही करावी”
अजित पवार फिल्डवर काम करणारे नेते आहेत. ते फार मीडिया फ्रेंडली नाहीत. त्यांना वृत्तपत्रात प्रसिद्धीची चिंता नसते. त्यांना आपल्या हातात घेतलेल्या पुर्ण करण्याच्या कामांची चिंता असते. त्यामुळे त्यांचा हा स्वभाव फार वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहे. ते त्यांचं काम करीत असून राज्यासाठी आणि राष्ट्रवादीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा…ठाकरेनंतर आता जयंत पाटलांनीही दिला राज्य सरकारला इशारा, म्हणाले, “जर सरकार ते टाळून रेटारेटी केली तर………”
दरम्यान, आज जरी सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निकाल दिला तरी त्यांच्याकडे विधानसभेमध्ये जे बहुमत लागतं ते पुर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे. या निकालाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. निर्णय विरोधात गेलं तर त्यांच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. परंतु त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली, त्यांना ३ जिल्हातील लोकही ओळखत नाही”
हेही वाचा…“साथ द्यायचं सोडून चंद्रकांत पाटील अन् शंभुराज देसाई कोणत्या बिळात लपून बसले ?”
हेही वाचा…“महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर फडकवण्यासाठी आबा मी आज उद्धवसाहेबांसोबत”, स्नेहल जगतापांचा ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…“अजित पवार भाजपसोबत येणार नाहीत, राष्ट्रवादीची नौटंकी चाललीय”
हेही वाचा…“सरकार पडल्यानंतर त्यांचं काय करायचं ते आम्ही करू”, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार घणाघात