रायपूर : आपल्या कार्यकर्त्यांची संख्या एवढी आहे की त्यांनी नुसतं थुंकलं तरी हे सरकार वाहून जाईल असं वादग्रस्त विधान डी.पुरंदेश्वरी यांनी केलं आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या मंत्रिमंडळाबाबत बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. पुरंदेश्वरी यांच्या विधानाचा निषेध काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून व्यक्त केला जात आहे.
भाजपचा झोलझाल, चंद्रकांत पाटलांनी लिलाव करून पदे वाटली – राष्ट्रवादी
“आपले कार्यकर्तेच इतके आहेत की त्यांनी नुसतं मागे वळून थुंकलं तरी मुख्यमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ वाहून जाईल”, असं पुरंदेश्वरी म्हणाल्या. छत्तीसगढमधील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. बस्तर जिल्ह्यात आयोजित चिंतन शिबीरात त्या बोलत होत्या.
12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीकडून ढवळाढवळ; राजू शेट्टी यांचा केला “करेक्ट कार्यक्रम”
“छत्तीसगडमधील जनता सत्ताधारी पक्षाला योग्य उत्तर देईल. तुम्ही सर्वांनी संकल्प करुन काम करण्याचं मी आवाहन करते. २०२३ सालच्या निवडणूक जिंकण्यासाठी जोमानं काम करा. तुम्ही नुसतं मागे वळून थुंकलात तरी भुपेश बघेल आणि त्यांचं सरकार वाहून जाईल”, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, भुपेश बघेल यांनी या विधानाचा निषेध करताना डी. पुरंदेश्वरी यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती, असं म्हटलं आहे. आकाशात पाहून थुंकण्याच्या गोष्टी कुणी करू नये, असंही ते म्हणाले.
Read Also :
- राष्ट्रवादीचे एक पाऊल पारदर्शक कारभाराकडे; ‘सीसीटीव्ही’तून तपासणार स्वत: च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा
- नियम पाळा, पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका – अजितदादांनी खडसावलं
- मोठी बातमी : बैलगाडा शर्यतींचा ‘धुरळा’ उडणार, न्यायालयाकडून अखेर परवानगी
- १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
- विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – विनायक मेटे