पुणे : कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय हे आपण सर्वच पाहात आहोत. त्यामुळे नियम पाळले पाहिजेत हे सर्वांनी समजून घ्यायला हवं. कोरोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झाला आहे. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी. अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल आणि पुन्हा सगळं बंद करण्यासाठी भाग पाडू नका, असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी प्रतिनिधींशी बोलत होते.
फास आणखी आवळला, देशमुखांचे वकिल आणि तिवारी यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी
“कोरोना संपल्याच्या अविर्भावात अनेकजण वावरत आहेत. हे काही योग्य नाही. हे थांबायला हवं. काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ लोकांनी सरकारवर आणू नये”, असंही अजित पवार म्हणाले. “काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूनं आहे. केंद्र सरकारनंही सांगितलं आहे की खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी करताहेत”, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
“शिवसेनेला मराठवाडा-विदर्भात भाजपने वाढवलं”, चंद्रकांत पाटलांचं विधान
राज्य सहकारी बँकेवर ईडीनं छापेमारी केल्याचं वृत्त सोशल मीडियात व्हायरल झालं. मात्र अशी कुठलीही घटना घडलेली नाही. या धादांद खोट्या बातम्या आहेत. मीडियानं विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास आता उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले. “मी ४० वर्ष राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीनं बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जाता हे दुर्दैवी आहे. काही लोकांमुळे सहकारी खातं बदनाम होतंय”, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
Read Also :
- मोठी बातमी : बैलगाडा शर्यतींचा ‘धुरळा’ उडणार, न्यायालयाकडून अखेर परवानगी
- १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
- विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – विनायक मेटे
- “त्यावेळी कुठे गेला कायदा? नवाब मलिकजी…”, CBI च्या कारवाईवरून भाजप-राष्ट्रवादीत वाक्युद्ध
- काही नावांवर राज्यपालांचा आक्षेप, आता अजित पवारांनी केले राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य