पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर काल दिल्ली येथे झालेल्या बैठकीसंदर्भात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. सध्या सीमाप्रश्न अधिक पेट घेण्यामागे विरोधकांचा हात असावा अशी काहींना शंका वाटत असेल तर सत्ताधाऱ्यांनी या मागचा शोध घेऊन दूध का दूध और पानी का पानी करावं, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे.
“हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार, असे चित्र उभे करण्याचा हा भाजपचा डाव”
पुढे अजित पवार म्हणाले की, आम्ही सत्तेत आणि विरोधात काम केल आहे, आम्ही कधीही राज्याच्या किंवा देशाच्या एकसंधतेला धक्का लागणार नाही, कोणती चुकीची गोष्ट आमच्याकडून घडणार नाही हा दृष्टीकोन आमचा आहे. हा प्रश्न सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे, यासाठी महाराष्ट्राच्या बाजूने आपली बाजू अतिशय चांगल्याप्रकारे मांडण्यासाठी राज्य सरकारने हरीश साळवे यांच्यासारख्या वकीलाची नेमणूक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
“सुषमाताई, बाळासाहेबांची आता नाक घासून माफी कधी मागणार”; मनसेची आक्रमक भूमिका
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यातून हा वाद अधिक चिघळत गेला यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम झाले अशी भावना महाराष्ट्रवासियांमध्ये झाली आहे. त्यामुळे आता दोन्ही राज्य सरकारने सामंजस्य भूमिका घ्यायला हवी, असे मत त्यांनी मांडले. पुढे अजित पवार म्हणाले की, सीमाप्रश्नावर अनेकदा कमिटी स्थापन झाल्या, अनेक चर्चा झाल्या मात्र यातून महाराष्ट्र आपला भाग मागत व कर्नाटक एक इंचही भाग द्यायला तयार नाही हे सतत पुढे आले. काल स्थापन केलेल्या सरकारी अधिकारी व मंत्र्यांच्या कमिटीमधून चांगल्या गोष्टी घडतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र या प्रश्नावर अजूनही सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवले जाईल, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अखेर गृहमंत्र्यांनी तोडगा काढला, म्हणाले…;
राज्य सरकारने मोर्चाला परवानगी दिली नसली तरी लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आम्हाला अधिकार आहे. महाविकास आघाडीने येणाऱ्या १७ डिसेंबर मुंबई येथे राज्यद्रोहीं विरोधी हल्लाबोल मोर्चाचे अयोजन केले आहे. या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी दिलेली नसली तरी लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आम्हाला आधिकार आहे असे अजित पवार यांनी राज्य सरकारला ठणकाहून सांगितले. महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा प्रयत्न, आमच्या दैवतावर व महापुरुषांवर बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे या मोर्चाला परवानगी द्यायची की नाकारायची हा त्यांचा अधिकार आहे पण आम्ही मोर्चा काढणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
Read also
- “सरकार बदलेलं त्यादिवशी सगळ्यांचा हिशोब पुर्ण केला जाईल”; संजय राऊतांचा इशारा
- “महाराजांनी ठरवलं असतं तर आजही राजेशाही अस्तित्वात असती,पण…;” उदयन राजेंचं सुचक वक्तव्य
- वाहतुक कोंडीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार, जोरदार आंदोलन करत प्रशासन, शासनाला घेतले धारेवर
- “आमचा मोर्चा कोणतंही सरकार थांबवू शकणार नाही,” संजय राऊत असे का म्हणाले ?
- “संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ?” भाजपचा सवाल