मुंबई : केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यातच मध्यंतरी विरोधातील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठी मागे लागला. यामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी आघाडी सरकारमधील नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली. यातच आता आयएनएस विक्रांत निधी अपहरण प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी क्लिन चिट देण्यात आली आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत कडक शब्दात इशारा दिला आहे.
“सुषमाताई, बाळासाहेबांची आता नाक घासून माफी कधी मागणार”; मनसेची आक्रमक भूमिका
आयएनएस विक्रांत निधी अपहरण प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखने सोमय्या पितापुत्रांना दिलासा दिला आहे. त्यावर राऊत म्हणाले की, राज्याच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न विचारायला हवा. आमच्या लोकांना क्लीन चिट मिळणार नाही. हा खरं तर इडीच्या अख्त्यारितला विषय आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी झालेला हा खेळखंडोबा आहे. पण आज जरी क्लिन चीट मिळाली असली तरी 2024 ला हे प्रकरण समोर येणार नाही. कोणतंही सरकार हे कायमस्वरूपी नसतं. सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पुर्ण केला जाईल. अशा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अखेर गृहमंत्र्यांनी तोडगा काढला, म्हणाले…;
सरकार बदलल्यानंतर ज्या अनेक गोष्टी अपेक्षित असतात, त्यातीलच ही एक गोष्ट आहे. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. आयएनएससाठी पैसे गोळा झाल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. मग तो एक रूपया असेल किंवा 50 कोटी असतील. पैशांचा अपहार झालाच आहे. पैसे राजभवनात गेले असं म्हणतात आणि राजभवन म्हणतं पैसे आलेच नाहीत. हाच तर भ्रष्टाचाराचा सगळ्याच मोठा पुरावा आहे. असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
Read also
- “महाराजांनी ठरवलं असतं तर आजही राजेशाही अस्तित्वात असती,पण…;” उदयन राजेंचं सुचक वक्तव्य
- वाहतुक कोंडीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार, जोरदार आंदोलन करत प्रशासन, शासनाला घेतले धारेवर
- “आमचा मोर्चा कोणतंही सरकार थांबवू शकणार नाही,” संजय राऊत असे का म्हणाले ?
- “संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ?” भाजपचा सवाल
- “हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार, असे चित्र उभे करण्याचा हा भाजपचा डाव”