मुंबई : आपण जर स्वत: ला सावरलं नाही, तर या देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रतही विदर्भ, खानदेश, मराठवाडा,कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे तुकडेही होतील. अशी शक्यता भाजपचे खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केली. तसेच शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे आपल्याला आजची ही परिस्थिती पाहायला मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट करत या परिस्थितीचा मनाला दुख: होत आहे. हे देखील ते सांगायला विसरले नाहीत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अखेर गृहमंत्र्यांनी तोडगा काढला, म्हणाले…;
राज्यपालांनी मागील काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून उदयन राजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून हद्दपार करा, असे ते सातत्याने सांगत आहेत. परंतु केंद्र सरकारने अद्यापही या गोष्टींकडे लक्ष्य दिले नाहीत. त्यामुळे उदयन राजे हे केंद्र सरकार आणि भाजपवर नाराज असल्याचं त्यांच्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे.
“जिकडे सत्ता तिकडे पुढेच बच्चू कडू चिपळ्या वाजवयाला पुढे असतात”; राऊतांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर
शिवाजी महाराजांना वाटलं असतं की राजेशाही अस्तित्वात ठेवावी, तर या देशात अजूनही राजेशाहीच असती. त्याकाळी जगात एकमेव शिवाजी महाराज होते की त्यांना वाटलं लोकांचा सहभाग राज्यकारभारात असालयला हवा. त्यामुळे इथे लोकशाही अस्तित्वात आली. पण नंतर देशाची फाळणी झाली. असं त्यांनी नमुद केलं.
“निव्वळ फेसबुकवर पोकळ गप्पा मारून चालत नाही, त्यासाठी..;” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेेंना टोला
दरम्यान, महापुरूषांना बदनामकारक वक्तव्य सातत्याने केले जात आहे. त्याकडे देखील त्यांनी मोर्चा वळविला. थोर पुरूषांनी आपलं आयुष्य लोकांसाठी वेचलं. लोकांचं कल्याण व्हावं हाच त्यांचा ध्यास होता. असं असूनही वारंवार त्यांची बदनामी वेगवेगळ्या माध्यमातून केली जात आहे. चित्रपट असेल किंवा जाहीरपणे केली जाणारी वक्तव्यं असतील. का कुणास ठाऊस, पण ही विकृती दिवसेंदिवस वाढतेय. असा फटकार देखील त्यांनी विरोधकांना लगावला.
Read also
- वाहतुक कोंडीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार, जोरदार आंदोलन करत प्रशासन, शासनाला घेतले धारेवर
- “आमचा मोर्चा कोणतंही सरकार थांबवू शकणार नाही,” संजय राऊत असे का म्हणाले ?
- “संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ?” भाजपचा सवाल
- “हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार, असे चित्र उभे करण्याचा हा भाजपचा डाव”
- “सुषमाताई, बाळासाहेबांची आता नाक घासून माफी कधी मागणार”; मनसेची आक्रमक भूमिका