मुंबई : लोकसभा निवडणुकीबाबत सध्या अनेक दावे-प्रतिदावे राजकीय पक्षांकडून केले जात आहेत. यातच ठाकरे गट आणि भाजपमधील नेत्यांमध्ये जोरदार खडांजगी बघायला मिळत आहेत. तर राज्यात आम्हीच जास्त जागा जिंकू, असा दावाही राज्यातील नेत्यांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.
हेही वाचा…“२६ जानेवारीला मराठा आंदोलन मुंबईत धडकणार ,” कुठे मुक्काम कुठे जेवण ? जरांगे पाटलांनी दिली माहिती
महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागा महायुती जिंकणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लोकसभेची एक जागा जिंकून दाखवावी. ठाकरे गटाकडून २५ ते ३० जागांची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटानं २५ जागांवर लढावं किंवा ३ जागांवर लढावं. पण एका जागेवर निट लक्ष देऊन खासदार निवडून आणून दाखवावा. असं आवाहनच गिरीश महाजन यांनी ठाकरेंना दिलंय.
हेही वाचा….मोठी बातमी…! “एक फोन आला अन्…. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
दरम्यान, नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार असल्याचं जनतेनं ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत आपण ४०० हून अधिक जागा जिंकणार आहोत. सत्ता आल्यानंतर भारत जगात एक नंबर बनेल. जगातील नेते पंतप्रधान मोदींची प्रशंसा करतात. या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव, नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्याविरोधात याचिका दाखल
हेही वाचा….“अकोला लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकरांना सोडली,” केंद्रीय राज्यमंत्र्यांचं मोठं विधान
हेही वाचा…५० लोकांचा ताफा सोबतीला अन् त्यांच्यासाठी ३४ कोटींचा खर्च ; मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा चर्चेत
हेही वाचा…“गेम केला मास्टरमाईंडला सांगा,” शरद मोहोळ प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंटला अटक
हेही वाचा…मिलिंद देवरांच्या प्रवेशामुळे दक्षिण लोकसभेची गणितं बदलली, भाजप दावा सोडणार, सावंत विरूद्ध देवरा असा सामना होणार