मुंबई : दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या सहभागासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३४ कोटी रूपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आलंय. झआपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतील जागेचे आरक्षण, दालनाचीउभारणी यासह शिष्टमंडळात सहभागी होणाऱ्या सदस्यांचा व्हिजा, विमान प्रवास, निवास, स्थानिक प्रवास खर्च व सुरक्षेसाठी १८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलीय. मागच्या वर्षी या दौऱ्यावर एमआयडीसीने ३२ कोटी ३१ लाख रूपये खर्च केला होता. यात मुख्यमंत्री एनकाथ शिंदे आणि काही सदस्यांच्या चार्टर्ड विमान प्रवासासाठी एक कोटी ८९ लाख रूपये मोजण्यात आले होते. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलंय.
हेही वाचा…“छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्रीराम सेवक आणि कारसेवक”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
५० लोकांचा ताफा सोबतीला आणि त्यांचा ३४ कोटींचा खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री दावासला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. इतकं करूनही गुंतवणूक महाराष्ट्रात येणार का ? की केंद्रात बसलेल्या महाशक्तीच्या ताकदीने गुजरामध्ये जाणार ? असा खोचक सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत तिथे राज्याचे हिताचे किती कामे होतील? दौऱ्याचा खर्च बघता हा दावोस दौरा सरकारच्या मर्जीतील अधिकारी, नतेे आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळींच्या पर्यटनासाठी आहे का ? असाही सवाल त्यांनी केलाय.
हेही वाचा…शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला अटकेत, पनवेलच्या फार्महाऊसवर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
तर ही जागतिक आर्थिक परिषद आहे की जागतिक खर्चिक परिषद आहे. असा सवाल करत आमदार रोहित पवारांनी यावर संताप व्यक्त केलाय. गुंतवणूकीचा एकही MoU न झालेल्या राज्यातील पाच अधिकारी आणि ओएसडी यांच्यासह सहा महिन्यांपुर्वी झालेल्या तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल १ कोटी ८८ लाख रूपयांचा निधी देण्यात आला. त्यानुसार दिवसाला ६० लाख तर प्रत्येक व्यक्तीसाठी ३८ लाख रूपये खर्च करण्यात आला. दुसरीकडे राज्यातील प्रगतशील १२० शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शासन केवळ १ कोटी ४० लाख रूपये खर्च करत असल्याची टिका रोहित पवारांनी केलीय.
दावोसबाबत पडलेला प्रश्न…
ही ‘जागतिक आर्थिक परिषद’ आहे की ‘जागतिक खर्चिक परिषद’?
गुंतवणुकीचा एकही MoU न झालेल्या राज्यातील पाच अधिकारी आणि OSD यांच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल १ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.… pic.twitter.com/wGAgpMfxmZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2024
५० लोकांचा ताफा सोबतीला आणि त्यांचा ३४ कोटींचा खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री दावोस ला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
इतकं करून ही गुंतवणूक महाराष्ट्रात येणार का? की केंद्रात बसलेल्या महाशक्तीच्या ताकदीने गुजरात मध्ये जाणार?
महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत तिथे…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 15, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“गेम केला मास्टरमाईंडला सांगा,” शरद मोहोळ प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंटला अटक
हेही वाचा…मिलिंद देवरांच्या प्रवेशामुळे दक्षिण लोकसभेची गणितं बदलली, भाजप दावा सोडणार, सावंत विरूद्ध देवरा असा सामना होणार
हेही वाचा…“२६ जानेवारीला मराठा आंदोलन मुंबईत धडकणार ,” कुठे मुक्काम कुठे जेवण ? जरांगे पाटलांनी दिली माहिती
हेही वाचा.मोठी बातमी…! “एक फोन आला अन्…. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
हेही वाचा…“मोदी नकोच, अन् मोदींसोबतचे ढोंगीपण नको, “शिवसेनेच्या धर्मवीरांच्या ठाण्यात लागले बॅनर