मुंबई : निवडणुक आयोगाबरोबर आता विधानसभा अध्यक्षांनी देखील शिवसेना पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाबाबत ठाकरे गटाचा रोष आता वाढतच चालला आहे. यातच मुंबई जिंकण्यासाठी भाजपने मागील काही वर्षापासून हालचाली सुरू केल्या होत्या. त्यात त्यांना यश मिळतांना दिसत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलिकडे महाराष्ट्र दौरा देखील वाढतच चालला आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ठाण्यात ‘मोदी नकोच’, अशा आशायाचे बॅनर सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतांना दिसत आहेत.
हेही वाचा…“मोदींना महान म्हणायचे फक्त पाकिस्तान अन् उद्धव ठाकरेच राहिले”, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान
मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने मागील काही वर्षापासून प्रयत्न सुरू केले आहेत. यातच शिवसेनेत मोठी फुट पडल्याने आता मुंबई महापालिका जिंकण्याचा भाजपचा मार्ग सोपा झाला आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र दौरे देखील वाढले आहेत. यावरून ‘मोदी नकोच’ , आणि मोदींसोबतचे ढोंगी पण नको, असे बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहेत.
हेही वाचा…“गद्दारांना पाताळात असं गाडायचं की डिपॉझिट जप्त झालं पाहिजे”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यातच मोदी नकोस असे बॅनर लागल्याने याची एकच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावर यांनी ठाणे शहाराध्या मध्यवर्ती भागात हे बॅनर लावले आहेत. तर ठाकरे म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजेच ठाकरे असे बॅनरही काही ठिकाणी लागले आहेत. यातच तुम्हाला पटतंय ना ? असा सवाल देखील बॅनरवरून करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्रीराम सेवक आणि कारसेवक”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला अटकेत, पनवेलच्या फार्महाऊसवर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…“निमंत्रण असूनही काॅंग्रेस राम मंदिराच्या कार्यक्रमाला का जाणार नाही ?” शरद पवारांनी सांगितलं कारण म्हणाले..
हेही वाचा..उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार ? भाजपने दिले चॅलेंज
हेही वाचा…मोठी बातमी..! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून खर्गे तर संयोजकपदी नितीश कुमारांची नियुक्ती