मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने जय्यत तयारी केली आहे. यातच पुढील निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीला इंडिया आघाडीतील १४ पक्ष सहभागी झाले होते. राज्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर उपस्थित राहिले तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत.
हेही वाचा…काळाराम मंदिराच्या सफाईसाठी ८ ते १० लाख खर्च..! मोदींना साफ सफाई करण्याची गरज होती काय ?
इंडिया आघाडीच्या संयोजक पदाबाबत मागील काही दिवसांपासून खूप चर्चा सुरू होती. त्याचमुळे आता इंडिया आघाडीने काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मल्लिकार्जून खर्गे यांना आगामी निवडणुकांसाठी इंडिया आघाडीच्या प्रमुखपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संयोजकपदी नियुक्त करण्यात आलंय. पण इंडिया आघाडीतील सर्व पक्षांची सहमती असेल तरच संयोजक पद स्विकारू, असे नितीश कुमार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…महायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा ; वडेट्टवारांनी पुरावा देत घोटाळा केला उघड
दरम्यान, नितीश कुमार यांना संयोजक म्हणून नियुक्त करण्यासाठी जनता दलाकडून दबाव टाकण्यात येत होता. तर यास तृणमूल काॅंग्रेसकडून विरोध करण्यात येत होता. इंडिया आघाडीच्या मागील बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपद आणि संयोजकपदासाठी मल्लिकार्जून खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींना महान म्हणायचे फक्त पाकिस्तान अन् उद्धव ठाकरेच राहिले”, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान
हेही वाचा…“गद्दारांना पाताळात असं गाडायचं की डिपॉझिट जप्त झालं पाहिजे”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…मनसेच्या ताब्यातील सर्वोकृष्ट ग्रामपंचायतीला राज ठाकरेंकडून ५ लाखाचं बक्षीस जाहीर, म्हणाले…
हेही वाचामला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण… : शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“..तर शरद मोहोळ वाचला असता,” पोलिस तपासात मोठी माहिती समोर