पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. घराणेशाही आली आहे. ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? असा सवाल करत शरद पवारांनी अनेक उत्तरं दिलीत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नसल्याचेही शरद पवारांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा
पुण्यातील जुन्नरमध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शऱद पवार यांनी शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही. पण मी जाणार . मात्र २२ जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाणार, श्रीराम हे सर्वांचे आहेत. असेही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा…पुणे लोकसभा जिंकायचीय मग हे निकष पार पाडा, भाजपच्या इच्छूक उमेदवारांना दिले आदेश
दरम्यान, अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकीटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आले आहेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेलं नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणं चुकीचं राहिलं. राम मंदिराचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिरात काम पुर्ण व्हायला आणखी दोन वर्ष तरी लागतील असेही शरद पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर शरद मोहोळ वाचला असता,” पोलिस तपासात मोठी माहिती समोर
हेही वाचा…काळाराम मंदिराच्या सफाईसाठी ८ ते १० लाख खर्च..! मोदींना साफ सफाई करण्याची गरज होती काय ?
हेही वाचामहायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा ; वडेट्टवारांनी पुरावा देत घोटाळा केला उघड
हेही वाचा“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..