पुणे : मनसेच्या विजयी सरपंच तसेच पंचायत सदस्य यांनी महाराष्ट्रात उत्तम कारभार करावा. ज्यांनी मतदान केलं नसेल त्यांच्यावर सूड उगवू नका. कारभार करताना कुणाविषयी असूया ठेवू नका. एक उमदं वातावरण उभं करा. विश्वासाने सांगतो लोक आपल्यामागे उभी राहतील. तसेच महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेच्या हाती असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वांगाने स्वच्छता आणि उत्तम कारभार करणाऱ्या सर्वोकृष्ट ग्रामपंचायतीला मी स्वत : पाच लाखाचं बक्षीस जाहीर करतो. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
कालपासून कणकण जाणवतेय, अशक्त वाटतंय… आज इथं येणं शक्य होणार नाही असं वाटत होतं पण महाराष्ट्रभरातून तुम्ही आलात तुमचंही दर्शन घेणं तितकंच महत्त्वाचं होतं म्हणून आज माझ्या सर्व विजयी सरपंचांना, ग्रामपंचायत सदस्यांना भेटण्यासाठी आलो. तुम्ही राजकारणात पहिलं पाऊल टाकलंय याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. तुमची हि राजकीय वाटचाल यशस्वी ठरो, अशा सदिच्छा व्यक्त देतो. आपल्या गावात काय करायचं ह्याबद्दल तुम्ही सुज्ञ आहात, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझे सहकारी उत्सुक असतात पण मला तुम्हाला एकंच सूचना करायची ते म्हणजे आपलं गाव सर्वांगाने स्वच्छ ठेवा. १९८९ सालापासून मी राजकारणात सक्रिय आहे, उभा महाराष्ट्र अनेकदा फिरलो पण एक दुरावस्था मला सतत जाणवली ती म्हणजे अस्वच्छ खेडी. त्या अस्वच्छतेमुळे ग्रामस्थांची जगण्याची उर्मीच संपून जाते. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा
पुढे बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, माझ्या ‘अस्थेटिक व्हिजन’च्या माहितीपटात पण मी एक विचार मांडला होता कि आपला परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही इच्छाशक्ती लागते. आपलं भवताल स्वच्छ – सुंदर – समृद्ध तर आपलं मन मोठी स्वप्न पाहिलं आणि आपल्या गावात समृद्धी येईल. आपली ग्रामीण तरुणाई शहरात यायला बघत आहे आणि शहरातील तरुणाई परदेशात जायला… तरुणाई हे स्थलांतर फक्त शिक्षण-नोकरीसाठी नव्हे तर शहरांमधलं वातावरण, तिथली जीवनपद्धती त्यांना खुणावते आहे. ह्यावर आपण विचार करायला हवा. आपल्या गावात तरुणाईच्या मनात ऊर्जा निर्माण होईल असं वातावरण उभं करा.
READ ALSO :
हेही वाचामला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण… : शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“..तर शरद मोहोळ वाचला असता,” पोलिस तपासात मोठी माहिती समोर
हेही वाचा…काळाराम मंदिराच्या सफाईसाठी ८ ते १० लाख खर्च..! मोदींना साफ सफाई करण्याची गरज होती काय ?
हेही वाचामहायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा ; वडेट्टवारांनी पुरावा देत घोटाळा केला उघड
हेही वाचा“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं