मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र तसेच नाशिक दौरा, राम मंदिर, तसेच शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावरून उद्धव ठाकरे सातत्याने भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडत आहेत. त्याला भाजपकडून देखील ठाकरे गटावर जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांनी सात जन्म घेतले तरी ते देवेंद्र फडणवीसांशी बरोबरी करू शकणार नाहीत. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यावरून आता मोठा वाद निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा…महायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा ; वडेट्टवारांनी पुरावा देत घोटाळा केला उघड
उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस समजलेच नाहीत. गेली सुमारे ३२ ते ३५ वर्ष देवेंद्र फडणवीस यांना ओळखतो. त्यांच्यासोबत काम करत आहे. राज्याला क्रमांक एकवर आणणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जीवाचे रान केले आहे. उद्धवजी फोटोग्राफी करायचे, तेव्हा देवेंद्र फडणवीस कारसेवक होते. सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करू शकणार नाहीत. असा टोला बावनकुळेंनी ठाकरेंना लगावला आहे. बाबरी पाडली होते, तेव्हा फडणवीसांचे वय काय होते ? असा सवाल ठाकरेंनी केला होता.
हेही वाचा…“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना चित्रफित नीट पाहिली नाही. अटल सेतूचे लोकार्पण करताना सर्वत्र बॅनरवर, जाहिरातीत अटलींचा फोटा होता. मी नेहमीच म्हणतो उद्धव ठाकरे मीडियासमोर येऊन नॅरेटिव्ह सेट करतात. मोदी यांना जगातला सर्वोत्तम नेता असे जग म्हणते. पण मोदी यांना महान म्हणायचे फक्त पाकिस्तान आणि उद्धव ठाकरेच पाहिले आहेत. असा टोलाही बावनकुळेंनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गद्दारांना पाताळात असं गाडायचं की डिपॉझिट जप्त झालं पाहिजे”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…मनसेच्या ताब्यातील सर्वोकृष्ट ग्रामपंचायतीला राज ठाकरेंकडून ५ लाखाचं बक्षीस जाहीर, म्हणाले…
हेही वाचामला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण… : शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“..तर शरद मोहोळ वाचला असता,” पोलिस तपासात मोठी माहिती समोर
हेही वाचा…काळाराम मंदिराच्या सफाईसाठी ८ ते १० लाख खर्च..! मोदींना साफ सफाई करण्याची गरज होती काय ?